Wednesday, August 5, 2026
Homeवर्धापट्टेदार वाघाचा पाण्यात आढळला मृतदेह..

पट्टेदार वाघाचा पाण्यात आढळला मृतदेह..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
वर्धा :-एका पट्टेदार वाघाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.सदरची घटना वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट तालुक्यातील सेलू मुडपाड परिसरातील मोठा नहराच्या (कॅनल)पाण्यात उघडकीस आली.सकाळच्या सुमारास शेतशिवारात कामासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना वाघ पाण्यावर तरंगताना दिसून आला.कॅनलमध्ये पाण्यात तरंगत असलेला वाघाचा मृतदेह पाहून शेतकऱ्यांनी तात्काळ वनविभागाला माहिती दिली.माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.मृत वाघाचा परिसर सील करून पंचनामा करण्यात आला.प्राथमिक पाहणीत वाघाच्या शरीरावर कुठल्याही प्रकारच्या बाह्य जखमा आढळून न आल्याने वाघाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला,हे अद्याप स्पष्ट झाले नाही.त्यामुळे वाघाचा नैसर्गिक मृत्यू झाला की शिकार अथवा विजेचा धक्का, विषबाधा किंवा अन्य कारणामुळे मृत्यू झाला,याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वाघाचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदन प्रक्रिया सुरू केली असून शवविच्छेदन अहवालानंतरच वाघाच्या मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार असल्याचे वनविभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बापरे..!अंतिम संस्काराची तयारी सुरू असतांनाच मृतक व्यक्तीने उघडले डोळे..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्यात एक अचंभित करणारी घटना काल मंगळवारी उघडकीस आली.एका ४० वर्षीय व्यक्तीची प्रकृती अचानक खालावल्याने कुटुंबीयांनी त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल...

ऑगस्ट महिन्यापासून गॅस कनेक्शनची ई-केवायसी असणे बंधनकारक; अन्यथा कनेक्शन होणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त :-गॅस सिलिंडरचा काळाबाजार थांबवण्यासाठी आणि साठेबाजी उघड करण्यासाठी केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील गॅस कंपन्या इंडेन, एचपी आणि भारत गॅसच्या ग्राहकांसाठी स्वयंपाकाच्या...

आता बनावट किंवा खोट्या कागदपत्रांच्या आधारे जातवैधता प्रमाणपत्र तयार करणे पडणार महागात..

उद्रेक न्युज वृत्त :-बरेचदा जातवैधता प्रमाणपत्र अर्थात कॉस्ट व्यालीडिटी सर्टिफिकेट बनावट किंवा खोट्या कागदपत्रांच्या आधारे बनवून शासकीय योजनांचा लाभ मिळवणे,शासकीय नोकरी,अभियांत्रिकी प्रवेश व इतर...

महामार्गाच्या विस्तारासाठी सरकारने शेतकऱ्यांना भूमिहीन करू नये- विजय वडेट्टीवार

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचा विस्तार भंडारा,गोंदिया,गडचिरोली आणि चंद्रपूरपर्यंत करण्यासाठी सुरू असलेल्या भूसंपादनात व सुपिक जमीन घेण्यासाठी प्रशासनाकडून बळजबरी केली जात असल्याचा आरोप...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!