- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या डीजीपी म्हणजेच पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांचा कार्यकाळ आज,बुधवार ३१ डिसेंबर रोजी संपत असून आता राज्याचे नवे पोलीस महासंचालक म्हणून सदानंद दाते यांची वर्णी लागली आहे.दाते हे येत्या ३ जानेवारीला पदभार स्वीकारणार आहेत.१९९० च्या बॅचचे आयपीएस अधिकारी सदानंद दाते यांना त्यांच्या मूळ कॅडरमध्ये परतण्यास केंद्र सरकारने अलीकडेच मान्यता दिली आहे.सदानंद दाते यांनी यापूर्वी राज्य दहशतवाद विरोधी पथकाचे(एटीएस) नेतृत्व केले आहे आणि मुंबईत सह
पोलिस आयुक्त (गुन्हे)आणि सह पोलिस आयुक्त
(कायदा आणि सुव्यवस्था)म्हणून काम केले आहे.
एनआयए प्रमुख होण्यापूर्वी,सदानंद दाते यांनी
महाराष्ट्रात दहशतवाद विरोधी पथकाचे(एटीएस)
प्रमुख म्हणून काम पाहिले.त्यांनी महाराष्ट्रात अनेक
महत्त्वाची पदे भूषवली आहेत,ज्यात मीरा-भाईंदर
आणि वसई-विरारचे पोलिस आयुक्त,सहआयुक्त
(कायदा आणि सुव्यवस्था)आणि मुंबईतील गुन्हे
शाखेचे सहआयुक्त यांचा समावेश आहे.त्यांनी
सीबीआयमध्ये उपमहानिरीक्षक आणि केंद्रीय
राखीव पोलिस दलात(सीआरपीएफ) लमहानिरीक्षक
म्हणूनही काम केले आहे.सदानंद दाते यांचा कार्यकाळ २०२७ च्या अखेरपर्यंत असणार आहे.
- Advertisement -

