- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
वर्धा :-एका पट्टेदार वाघाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.सदरची घटना वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट तालुक्यातील सेलू मुडपाड परिसरातील मोठा नहराच्या (कॅनल)पाण्यात उघडकीस आली.सकाळच्या सुमारास शेतशिवारात कामासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना वाघ पाण्यावर तरंगताना दिसून आला.कॅनलमध्ये पाण्यात तरंगत असलेला वाघाचा मृतदेह पाहून शेतकऱ्यांनी तात्काळ वनविभागाला माहिती दिली.माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.मृत वाघाचा परिसर सील करून पंचनामा करण्यात आला.प्राथमिक पाहणीत वाघाच्या शरीरावर कुठल्याही प्रकारच्या बाह्य जखमा आढळून न आल्याने वाघाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला,हे अद्याप स्पष्ट झाले नाही.त्यामुळे वाघाचा नैसर्गिक मृत्यू झाला की शिकार अथवा विजेचा धक्का, विषबाधा किंवा अन्य कारणामुळे मृत्यू झाला,याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वाघाचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदन प्रक्रिया सुरू केली असून शवविच्छेदन अहवालानंतरच वाघाच्या मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार असल्याचे वनविभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
- Advertisement -

