Monday, May 25, 2026
Homeचंद्रपूरकाळ्या बिबट्यांचे ताडोबात पर्यटकांना झाले दर्शन-  पर्यटकांनी लुटला आनंद

काळ्या बिबट्यांचे ताडोबात पर्यटकांना झाले दर्शन-  पर्यटकांनी लुटला आनंद

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

चंद्रपूर :- मागील काही वर्षांपासून अंत्यत दुर्मीळ असलेला काळा बिबट्याचे ताडोबात दर्शन होत होते. त्यामुळे जेनेटिक समस्येमुळे बिबट्याचा रंग काळा पडला असावा अशी चर्चा रंगत होती.परंतु काही दिवसांपूर्वीच एक मादी बिबट आणि तिच्यासोबत दोन काळ्या रंगाचे बछडे आढळून आल्याने पर्यटकही चक्रावून गेले.त्यांनी हा दुर्मीळ ठेवा आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे.ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघ जगप्रसिध्द आहे.त्यामुळे विदेश व देशातील पर्यटक सफारीसाठी येत असतात.वाघांच्या विविध करामतीमुळे पर्यटकही अचंबित होत असतात.तसेच अन्य वन्य जीवांच्या दर्शनाने पर्यटक जाम खुश होत असतात.मागील काही वर्षात काळ्या रंगाच्या बिबट्याचे दर्शन ताडोबात झाले होते.त्यामुळे सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले होते.परंतु त्यानंतर त्यांचे बऱ्याच कालांतराने दर्शन झाले.जानकारांनी जेनेटिक कारणामुळे त्याचा रंग काळा झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.काळ्या रंगाचे बिबत अन्य बिबट्याप्रमाणेच आहे.फक्त त्याचा रंग काळा आहे. ताडोबात केवळ एकटाच बिबट दिसून येत होता.परंतु काही दिवसांपूर्वीच ताडोबाच्या मदनापूर गेट परिसरात एक सामान्य मादा बिबट्यासोबत दोन काळे बिबट दिसून आले.हे बछडे नक्कीच त्या काळ्या नर बिबटचे असावे,असा अंदाज आहे. त्यामुळे ताडोबात दुर्लभ जातीच्या काळ्या रंगाच्या बिबट्याची भर पडल्याची शक्यता नाकारता येत नाही.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देशात जनगणनेची प्रक्रिया सुरू झाली; पण ओबीसी समाजासाठी स्वतंत्र रकानाच नाही.. देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर धडकणार ‘भव्य मोर्चा’..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):- "आमची संख्या,आमचा हक्क,आमचा सन्मान!" आणि "जनगणनेत स्वतंत्र कॉलम,आमचा हक्क!" अशी गगनभेदी गर्जना करत देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात...

रोजगार हमी योजनेच्या कायद्याची जागा घेणाऱ्या ‘व्हीबी-जी राम जी’ योजनेत १२५ दिवस काम देण्याची हमी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच कालावधीपासून सुरू असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-२००५ कायद्याची जागा आता 'विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजिविका...

सामान्य माणसाचा जीव २५ लाखांचा ठरवत असाल तर तुम्ही स्वतः वाघासमोर उभे राहा; आम्हीही तुम्हाला २५ लाख देतो..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नुकतेच चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही परिसरात वाघाच्या हल्ल्यात चार महिलांचा मृत्यू झाला.या घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.या पार्श्वभूमीवर सामाजिक...

वाढदिवसाचा कार्यक्रम असल्याचा बनाव; बालविवाहात सरकारी पाहुण्यांची एंट्री..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह २० वर्षीय तरुणासोबत लावल्या जात असल्याची माहिती नागपूर जिल्हा बालसंरक्षण कक्षाला प्राप्त होताच पथकाने अल्पवयीन मुलीची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!