- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-सर्वसाधारण चोरी जरी असली तरीही ती चोरीच समजली जाते.चोरटे कधी देवाच्या मंदिरातील दान पेटी चोरून नेतात,तर कधी कुणाची घरफोडी, दुकानातील साहित्य चोरी वा विविध तऱ्हेच्या चोऱ्या करून छोट्या-मोठ्या रकमेवर डल्ला मारतांना दिसून येतात.पण,बिचाऱ्या शेतकऱ्याने अगोदरच भंगार विक्रेत्याकडून बैलगाडीसाठी दोन लोखंडी चाके खरेदी केली होती आणि आता त्याही चाकांवर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारल्याने किती बदमाश म्हणावे हे चोरटे,अशी म्हणण्याची वेळ आली आहे.सदरची घटना चंद्रपूर जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील तळोधी (गोवर्धन वार्ड)येथे उघडकीस आली असून याप्रकरणी ५५ वर्षीय शेतकरी भोजराज काशीनाथ पाकमोडे यांनी काल बुधवारी तळोधी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात तक्रार दाखल केली आहे.
भोजराज पाकमोडे यांनी दोन वर्षांपूर्वी ओवाळा येथील भंगार विक्रेत्याकडून दोन लोखंडी चाके खरेदी करून बैलगाडीवर बसविली होती.भोजराज हे शेतमजुरीसह स्थानिक ग्रामस्थांचे साहित्य ने-आण करण्यासाठी बैलगाडीचा वापर करतात.मंगळवारी त्यांनी नेहमीप्रमाणे आपली बैलबंडी घरासमोरील डांबरी रस्त्याच्या कडेला लावली होती.रात्री १० वाजे पर्यंत बैलबंडी नेहमीसारखी जागेवरच होती.मात्र,काल बुधवारी बघतात तो काय बैलगाडीची दोन्ही लोखंडी चाके गायब असल्याचे त्यांना दिसून आले.त्यानुसार, परिसरात तसेच इतरत्र चौकशी करून शोध घेतला; मात्र चाके कुठेही आढळून आली नाहीत.प्रकरणी त्यांनी पोलिस ठाणे गाठून आपबिती कथन केली.
- Advertisement -

