- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय (MoHUA),भारत सरकार यांच्या निर्देशानुसार स्वच्छ भारत अभियान २.० अंतर्गत “स्वच्छता ही सेवा- २०२५” या अभियानाचा भाग म्हणून देसाईगंज नगरपरिषद मार्फत स्वच्छता पंधरवड्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी सतीश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली या कालावधीत अस्वच्छ ठिकाणांची स्वच्छता व त्यांचे परिवर्तन,सार्वजनिक जागांची स्वच्छता,सफाई मित्र सुरक्षा शिबीर,तसेच जनजागृतीसाठी स्वच्छता रॅली यांसारख्या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली.

२ ऑक्टोंबर २०२५ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आणि स्वच्छ भारत दिनाच्या निमित्ताने विशेष स्वच्छता रॅली व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाचे उद्घाटन सतीश चौधरी प्रशासक तथा मुख्याधिकारी,नगरपरिषद देसाईगंज यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान उमाकांत कवासे यांनी भूषविले.तर प्रमुख अतिथी म्हणून रुपेश कांबळे, तालुका कृषी अधिकारी देसाईगंज उपस्थित होते.तसेच शाळेचे मुख्याध्यापक खेमराज तिघरे, नगरपरिषदेचे विभाग प्रमुख स्वप्निल हमाने,प्रफुल हटवार,सौरभ नंदनवार,निशांत घोणमोडे,योगिता निंबार्ते,अनिल गोवर्धन,लवकुश उरकुडे,तसेच पुरुषोत्तम मेश्राम अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती,लुणकरन चौधरी,चैतन्यदास विधाते आणि समस्त गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शहरातून निघालेल्या स्वच्छता रॅलीचे नेतृत्व स्वतः मुख्याधिकारी सतीश चौधरी यांनी केले.तर त्यांना शाळेचे मुख्याध्यापक खेमराज तिघरे व नगरपरिषद विभाग प्रमुखांनी साथ दिली.या रॅलीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आणि ग्रामस्थांनी स्वच्छतेबद्दल जनजागृती केली.रॅलीची सांगता महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा नैनपूर वार्ड येथे झाली.यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर गीते,भाषणे व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून गांधीजी व शास्त्रीजींना अभिवादन केले.

मुख्याधिकारी सतीश चौधरी यांनी आपल्या मार्गदर्शनात स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले तसेच गांधीजींचे सत्य-अहिंसा तत्त्वज्ञान आणि शास्त्रीजींचा “जय जवान,जय किसान” हा संदेश आजच्या पिढीसाठी किती मार्गदर्शक आहे,हे अधोरेखित केले.अध्यक्ष उमाकांत कवासे यांनी शाळेच्या समस्या मांडल्या.तर चैतन्यदास विधाते यांनी ग्रामविकासाच्या गरजांबाबत मागणी केली.शेवटी शाळेचे मुख्याध्यापक खेमराज तिघरे यांनी आभार प्रदर्शन करून उपस्थित मान्यवर,ग्रामस्थ व विद्यार्थी यांचे मनःपूर्वक आभार मानले आणि स्वच्छ भारत अभियानात सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवावा,असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे संचालन मंगेश तुपट यांनी केले.तर कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम ईश्वर गहाने,अर्पणा जडे,तृषाली सुखदेवे,प्राची खरकाटे,प्रियंका तलमले व प्रमिला खरकाटे यांनी घेतले.कार्यक्रमाची सांगता सर्व उपस्थितांनी एकमुखाने घेतलेल्या स्वच्छता प्रतिज्ञेने करण्यात आली.
- रॅली व्हिडिओ👇
- Advertisement -

