- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून गुन्हेगारीने डोके वर काढले आहे.चंद्रपूर जिल्ह्याच्या मूल तालुक्यात मागील वर्षभरात हत्येच्या सहा घटना घडलेल्या असून गुन्हेगारीच्या घटना वारंवार घडत असल्याने मूल शहर गुन्हेगारीचे माहेरघर ठरले आहे.अश्यातच गुन्हेगारीचा नायनाट करण्यात पोलिस प्रशासन अपयशी ठरले असून कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत.नुकतेच २६ सप्टेंबर २०२५ रोजी दागिन्यांच्या लालसेपोटी मूल शहरातील वॉर्ड क्रमांक-१४,भीमवाडी येथील रहिवासी सेवानिवृत केंद्रप्रमुख सुनील गेडाम यांची हत्या करण्यात आली होती.प्रकरणातील आरोपींना तात्त्काळ फाशीची शिक्षा द्यावी,अशी मागणी मूल शहरवासीयांनी काल शुक्रवारी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनातून केली आहे.गुन्हेगारी प्रवृत्तीच्या परप्रांतीय नागरिकांना हद्दपार करावे,अशीही मागणी करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे,एनडीटिव्ही मराठीने दिलेल्या वृत्तानुसार, सन २०२४ मध्ये केवळ एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात एकूण ४२ हत्या,तर ५२ जीवघेणे हल्ले झाल्याची नोंद करण्यात आली आहे.सदरचा अहवाल चंद्रपूर जिल्ह्याच्या वाढत्या गुन्हेगारीवर प्रकाश टाकतो आहे.गोळीबार,हत्या,चोरी-चकारी,हाप मर्डर,दरोडे व इतर गुन्हेगारीने चंद्रपूर जिल्हा ढवळून निघत आहे.शांत म्हणवल्या जाणाऱ्या जिल्ह्याला जणूकाही कुणाची नजर लागली की काय?अशी म्हणण्याची वेळ आली आहे.
- Advertisement -

