- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यात काल शुक्रवारच्या रात्री वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावून शेतकरी बांधवांना एकप्रकारे दिलासा दिला.तर काही ठिकाणी वेगवान वाऱ्याने शेतातील उभे असलेले धानपिक खाली कोसळल्याने शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

एल निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाने उघडीप सुरू ठेवली आहे.पावसाळ्याच्या दिवसात सतत कोसळणारा पाऊस दूर कुठेतरी सुट्टीवर गेल्यासारखे वाटते.अश्यातच देसाईगंज तालुक्यात काल शुक्रवार १८ सप्टेंबरच्या रात्री आठ वाजेच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह दमदार पाऊस बरसला.एकट्या देसाईगंज शहरात ६९ मिमी पाऊस,तर तालुक्यात सरासरी ५४.५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. वादळी वाऱ्याने देसाईगंज तालुक्यातील उसेगाव- कासवी ते फरी मार्गावर झाडे कोसळली. अद्यापही मार्गांवर झाडे पडलेली असल्याने सदरचे मार्ग बंद पडले आहेत.उसेगाव येथील शेतकरी गोपाल शंकर बोरकर यांच्या शेतातील धानपिक वाऱ्याने खाली पडले. त्यातच,शेतात झाडे पडून शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.परिसरातील इतर शेतकरी बांधवांचेही वादळी वाऱ्याने नुकसान झाल्याने शेतीचे पंचनामे करून नुकसानभरपाईची मागणी शेतकरी बांधवांनी केली आहे.

- Advertisement -

