- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-देशात व मुख्य:ता महाराष्ट्रात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ तळागळातील वंचित समाज समजु लागला आहे.बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला समाजाच्या सर्वच स्तरातुन पाठिंबा मिळत असल्याने आंबेडकरांच्या नावाचे राजकारण करणारे काही सुपारीबाज पक्ष स्व:ताचे अस्तीत्व टिकवुन ठेवण्यासाठी ‘मिशन’ या नावाखाली समाजाची दिशाभूल करत असले तरी दोन हजार कोटींच्या आलीशान बंगल्यात राहुन आंबेडकरी चळवळ चालविल्या जाऊ शकत नाही,असे परखड मत वंचित बहुजन आघाडीचे गडचिरोली जिल्हा महासचिव राजरतन मेश्राम यांनी व्यक्त केले.
९० च्या दशकात व्ही.पी.सिंगांचे सरकार असतांना मंडल आयोगाची शीफारस करण्यात वंचित बहुजन आघाडीचे प्रणेचे ॲड.बाळासाहेब आंबेडकरांचा सिंहाचा वाटा होता.कैबिनेट मंत्रीपद नाकारुन बाळासाहेबांनी मंडल आयोग लागु करण्यासाठी व्ही. पी.सिंगांना प्रेरीत केले. मात्र,या देशातील कॉंग्रेस आणि बीजेपी सरकारने मंडल आयोग लागू करु दिला नाही.त्यातच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा नातू म्हणुन देशभरात पक्ष बळकटीचे प्रयत्न न करता ज्या-ज्या राज्यात आंबेडकरांची चळवळ चालविली जात आहे, त्या-त्या राज्यातील चळवळीच्या नेत्यांचे मनोबल वाढविण्याचे काम केले.मात्र,कालांतराने त्या पक्षांनी भाजपशी हातमिळवणी केली व सत्ता भोगली.मात्र रक्तात खरा आंबेडकरवाद नसल्याने त्यांनी भ्रष्टाचाराचा मार्ग अवलंबून चळवळ संपुष्टात आणली. २ हजार कोटींच्या आलीशान बंगल्यात राहुन आंबेडकरांच्या नावाने समाजाची दिशाभूल होत असल्याने एकेकाळचा राष्ट्रीय पक्ष असलेल्या तथाकथीत पक्षाने लोकसभेत साधा भोपळा फोडण्याची लायकी ठेवली नाही.खुल्या मंचावरुन भाजपला कशी मदत करता येईल,अशीच रणनिती आखली.उलट बाळासाहेब आंबेडकरांनाच भाजपची ‘बी टिम’ म्हणून असा अपप्रचार केला.मात्र,समाज आता सत्य ओळखु लागला आहे.महाबोधी बुद्ध विहार बोधगया आंदोलन,सोमनाथ सुर्यवंशी हत्या प्रकरणात थेट सुप्रिम कोर्टात लढा उभारला, नागपुरच्या दिक्षाभूमी अंडरग्राऊंड पार्कींग विरोधात आंदोलन,७८ लाख मतदान वाढीचे प्रकरण, मराठा आरक्षणाच्या प्रकरणात ओबीसींचे हक्क अबाधित राहण्यासाठी केलेल्या सुचना यावरुन महाराष्ट्रात बहुजनांची वंचितांची चळवळ खऱ्या अर्थाने फक्त बाळासाहेब आंबेडकरच चालवित आहेत.हे सत्य समजल्याने व ओळखल्याने महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात एससी,एसटी,ओबीसी व मुस्लिम समाज बाळासाहेबांना पाठिंबा देत आहेत.तर दुसरीकडे सुपारीबाज पक्ष आंबेडकरी मुव्हमेंट संपविण्यासाठी भाजपचे हस्तक बनुन काम करत आहेत.२ हजार कोटींच्या आलीशान बंगल्यात राहुन फक्त आपल्या परिवारासाठी संम्पत्ती गोळा करता येत असली तरी आंबेडकरी चळवळ चालविता येऊ शकत नाही,असे परखड मत राजरतन मेश्राम यांनी व्यक्त केेले.
- Advertisement -

