Tuesday, September 1, 2026
Homeमुंबईराज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच होणार अनुकंपा तत्त्वावरील मोठी पदभरती..

राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच होणार अनुकंपा तत्त्वावरील मोठी पदभरती..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच अनुकंपा तत्त्वावर मोठ्या प्रमाणावर भरती होत आहे. आतापर्यंत चतुर्थ श्रेणीतील पदांची भरती ही प्रामुख्याने खाजगी कंत्राटदारांमार्फत केली जात होती. मात्र,आता अनुकंपा तत्त्वावर ज्या जागा प्रलंबित आहेत; अश्या जागा थेट भरण्याचा निर्णय सरकारने घेतल्यामुळे,यासाठी अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे.राज्यातील शासकीय तसेच निमशासकीय संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे सेवेत असतांनाच निधन झाल्यास,त्यांच्या कुटुंबातील पात्र वारसाला त्याच विभागात नोकरी देण्याची तरतूद धोरणात आहे.हे धोरण प्रथम १९७३ साली लागू करण्यात आले.काळानुरूप त्यात अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत.सध्या या धोरणाचा लाभ प्रामुख्याने गट-क आणि गट-ड मधील पदांसाठी उपलब्ध आहे. मात्र,गेल्या काही वर्षांपासून या धोरणाअंतर्गत होणाऱ्या नियुक्त्या रखडल्या होत्या.त्यामुळे हजारो कुटुंबीय प्रतीक्षेत होते.राज्यभरात ९ हजार ५६८ उमेदवार अनुकंपा तत्त्वावरील नोकरीसाठी प्रतीक्षेत आहेत. त्यामध्ये सर्वात जास्त उमेदवार महानगरपालिका,जिल्हा परिषद आणि नगरपालिकांमधील आहेत.यामध्ये नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक उमेदवार प्रतीक्षेत आहेत.त्यानंतर पुणे,गडचिरोली आणि नागपूर या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो.अनुकंपा तत्त्वावरील पदभरतीची प्रत्यक्ष अंमलबजावणी ही येत्या,१५ सप्टेंबर २०२५ पासून होणार आहे.याबाबत त्या-त्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे नोकरीसाठी रांगेत उभ्या असलेल्या हजारो उमेदवारांना दिलासा मिळणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

एकल महिला सर्वेक्षणात नाव न समाविष्ट झालेल्या महिलांना नाव नोंदविण्याची संधी- देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतिश चौधरी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देसाईगंज शहरातील एकल प्रकारातील महिलांचे सर्वेक्षण संबंधित वार्डातील महिला बचत गटांच्या सदस्यांच्या माध्यमातून...

सलग २४ तास हस्तलेखनाचा अनोखा राष्ट्रीय विक्रम.. चंद्रपूरच्या वैष्णवी मांडवकरची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-चंद्रपूरची गुणी कन्या वैष्णवी विश्र्वंभर मांडवकर हिने सलग २४ तास अखंड हस्तलेखन (Handwriting)करून 'सांगितिक वारसा आणि कौटुंबिक प्रवास' हे ८३ पानांचे...

खत उत्पादक कंपनी अथवा विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना गरज नसलेल्या निविष्ठांची खरेदी करण्याची सक्ती करू नये- कृषी विभाग -सक्ती अथवा जादा दराने विक्रीबाबत तक्रार नोंदविण्याचे...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर रास्त दरात आणि पुरेशा प्रमाणात खते व निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाकडून नियमित नियंत्रण व तपासणी करण्यात...

पॅकेजिंगचा झोल; एक्सपायरी डेट बदलून पुन्हा बाजारात विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश.. -तब्बल ७५ लाखांहून अधिक किंमतीचा मुदतबाह्य साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दुकानात पॉकीटामध्ये मिळणारे विविध अन्न पदार्थ चवदार म्हणून आपण मोठ्या आवडीने खात असतो.प्रत्येक पॉकीटांवर सुरक्षित अन्नपदार्थांच्या चविंसाठी विशिष्ट कालमर्यादा नमूद केलेली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!