- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-महात्मा गांधी नगरपरिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वार्ड देसाईगंज येथे “एक राखी सैनिकांसाठी” उपक्रम उत्साहात पार पडला. काल शनिवारी रक्षाबंधन दिनाचे औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांनी वृक्षांना राखी बांधून पर्यावरणप्रेम जपले,तर वर्गातील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी एकमेकांना राखी बांधून आपुलकीचे बंध दृढ केले.सदर उपक्रमाचे नियोजन शाळेचे मुख्याध्यापक खेमराज तिघरे यांनी केले.तर विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्य शिक्षक ईश्वर गहाने व मंगेश तूपट यांनी केले.राखी बनविणे व निरुपयोगी वस्तूंपासून उपयोगी वस्तू तयार करण्याचे प्रात्यक्षिक शिक्षिका जडे व सुखदेवे यांनी दिले.तर कार्यक्रमाचे संचालन प्राची खरकाटे,प्रियंका तलमले यांनी केले.शाळेतर्फे विद्यार्थ्यांचे व्हिडिओ संदेश तथा लिखित शुभेच्छा राख्यांसोबत सीमेवरील सैनिकांना पाठवण्यात आल्या. “जसा वृक्ष मुळांच्या आधारावर वाढतो,तसाच देश सैनिकांच्या धैर्यावर उभा आहे.वृक्ष संवर्धन करा,पर्यावरण वाचवा आणि देशसेवेसाठी सदैव तत्पर राहा.”असा शाळेतर्फे प्रेरणादायी संदेश देण्यात आला.
- Advertisement -

