- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-दुचाकीने कार्यालयात जाण्यासाठी निघाले, पण वैनगंगा नदीच्या पुलावरून जात असतांना अचानकपणे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दोघेही थेट नदीत पडले.मात्र,नदी पात्रात आंघोळीसाठी आलेल्या उपस्थित नागरिकांनी दोघांचेही प्राण वाचविल्याची घटना आज,शनिवार १९ जुलै रोजी सकाळच्या सुमारास लाखनी तालुक्यातील गडेगाव येथील रहिवासी सुकराम फसाटे व जितेंद्र सपाटे यांच्या बाबतीत घडली.हे दोघेही भंडारा जिल्हा दूध संघाचे कर्मचारी असून आज सकाळच्या सुमारास भंडारा येथे कार्यालयात जाण्यासाठी दुचाकीने निघाले होते.वैनगंगेवरील जुन्या पुलावरुन जात असतांना त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकीसह दोघेही थेट नदीत पडले.पुलावरून जाणाऱ्या लोकांनी आरडाओरड केल्यानंतर नदीवर आंघोळीसाठी गेलेले तैराकी मित्र मंडळाच्या काही सदस्यांनी धाव घेत नदीत उडी मारली.उर्वरित सदस्यांनी नजीकच्या हनुमान मंदिरात ठेवलेली दोरी व लाईफ जॅकेट घेऊन पाण्यात फेकले.दोघांनाही लाईफ जॅकेट पाण्यातच घालून देण्यात आले.त्यानंतर दोघांनाही नदीतून बाहेर काढण्यात आले.नशीब बलवत्तर म्हणून दोघेही तैराकी मित्र मंडळाच्या सदस्यांच्या सहकार्याने बचावले.
- Advertisement -

