Wednesday, September 2, 2026
Homeदेसाईगंजब्रम्हपुरी-देसाईगंज मार्ग बंद; रपटा गेला वाहून..

ब्रम्हपुरी-देसाईगंज मार्ग बंद; रपटा गेला वाहून..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली) :-मागील दोन वर्षांपासून भुती नाल्यावरील इंग्रजकालीन पूल जीर्ण झाल्याने नव्या पुलाचे बांधकाम संथगतीने सुरू आहे.अश्यातच आवागमन करण्यासाठी भुती नाल्याच्या बाजूला
वळण मार्ग म्हणून तात्पुरता रपटा(कच्चा रस्ता)तयार करण्यात आला होता.मात्र,तीन दिवसांपासून दररोज पडणाऱ्या पावसामुळे ब्रम्हपुरी-देसाईगंज महामार्गावरील रपटा वाहून गेल्याने मार्गावरील जड वाहतूक पूर्णतः बंद झाली आहे.त्यातच दुचाकीधारक पर्यायी मार्गाचा वापर करीत आहेत.पर्यायी मार्गावर लहान पूल असल्याने अनेकजण जीव धोक्यात घालून प्रवास करू लागलेत. त्यामुळे एखादेवेळी अनुचित घटना घडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.सध्या स्थितीत पाऊस थांबण्याचे नाव घेत नसल्याने पाण्याचा प्रवाह वाढून परत पुन्हा संपूर्ण मार्ग बंद पडू शकतो.पुलावरून पाणी वाहत असतांना दुचाकी वा इतर वाहनांनी रस्ता ओलांडू नये,असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत असले तरीही काहीजण याकडे दुर्लक्ष करतांना दिसून येतात.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ग्रामसेवकांची वर्षातून केवळ एकच संवैधानिक ग्रामसभा घेण्याची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्याच्या शिवरे दिगर येथे १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास ग्रामसभे दरम्यान झालेल्या गोंधळ व दबावामुळे...

जागतिक नारळ दिन विशेष..! नारळ लागवड; शाश्वत उत्पन्नाचा ‘कल्पवृक्ष’..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आज बुधवार २ सप्टेंबर दरवर्षी २ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक नारळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. नारळाच्या झाडाचा जवळपास प्रत्येक भाग उपयोगात...

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!