- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-पुढील येत्या काळात मान्सून पूर्ण क्षमतेने सक्रिय असल्याने सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये आणि वैनगंगेच्या खोऱ्यात कधीही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.भविष्यात वैनगंगेच्या खोऱ्यांमध्ये मुसळधार पाऊस पडल्यास वैनगंगा आणि भंडारा जिल्ह्यातून वाहणाऱ्या इतर नद्यांना मोठा पूर येण्याची शक्यता आहे.त्यामुळे संभाव्य पुरावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि धरण प्रकल्पात पाणी साठवण क्षमता निर्माण करण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून गोसेखुर्द धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.त्यानुसार काल,शुक्रवार २० जून रोजी सायंकाळी ६ वाजतापासून गोसेखुर्द प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.वैनगंगा नदीत ८० क्युमेक (८० हजार लिटर प्रति सेकंद) पाणी सोडण्यात आले आहे.प्रकल्पाच्या पॉवर हाऊस गेटमधून सध्या पाण्याचा विसर्ग सुरू आहे.यामुळे धरणाच्या पलिकडच्या बाजूला वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढू शकते.त्यामुळे नदीकिनारी लगतच्या गावांमधील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.सध्या स्थितीत गोसेखुर्द धरण तुडुंब भरलेला आहे.त्यामुळे येत्या काळातील खबरदारीचा उपाय म्हणून हा प्रकल्प रिकामा करून ठेवला जात आहे.गोसीखुर्द प्रकल्पामध्ये सध्या ११०.१५४ दशलक्ष घनमीटर (१४.८८ टक्के) पाण्याचा जिवंत साठा असून काल शुक्रवारी सकाळी धरणाची पाणीपातळी २४१.६४० मीटर नोंदवल्या गेली.त्यानुसार सदरचा निर्णय घेण्यात आला आहे.
- Advertisement -

