Monday, September 7, 2026
Homeभंडाराखबरदारीचा उपाय म्हणून गोसेखुर्द धरणातून सोडले पाणी.. - नदीकिनारी गावांमधील नागरिकांना सतर्क...

खबरदारीचा उपाय म्हणून गोसेखुर्द धरणातून सोडले पाणी.. – नदीकिनारी गावांमधील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-पुढील येत्या काळात मान्सून पूर्ण क्षमतेने सक्रिय असल्याने सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये आणि वैनगंगेच्या खोऱ्यात कधीही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.भविष्यात वैनगंगेच्या खोऱ्यांमध्ये मुसळधार पाऊस पडल्यास वैनगंगा आणि भंडारा जिल्ह्यातून वाहणाऱ्या इतर नद्यांना मोठा पूर येण्याची शक्यता आहे.त्यामुळे संभाव्य पुरावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि धरण प्रकल्पात पाणी साठवण क्षमता निर्माण करण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून गोसेखुर्द धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.त्यानुसार काल,शुक्रवार २० जून रोजी सायंकाळी ६ वाजतापासून गोसेखुर्द प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.वैनगंगा नदीत ८० क्युमेक (८० हजार लिटर प्रति सेकंद) पाणी सोडण्यात आले आहे.प्रकल्पाच्या पॉवर हाऊस गेटमधून सध्या पाण्याचा विसर्ग सुरू आहे.यामुळे धरणाच्या पलिकडच्या बाजूला वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढू शकते.त्यामुळे नदीकिनारी लगतच्या गावांमधील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.सध्या स्थितीत गोसेखुर्द धरण तुडुंब भरलेला आहे.त्यामुळे येत्या काळातील खबरदारीचा उपाय म्हणून हा प्रकल्प रिकामा करून ठेवला जात आहे.गोसीखुर्द प्रकल्पामध्ये सध्या ११०.१५४ दशलक्ष घनमीटर (१४.८८ टक्के) पाण्याचा जिवंत साठा असून काल शुक्रवारी सकाळी धरणाची पाणीपातळी २४१.६४० मीटर नोंदवल्या गेली.त्यानुसार सदरचा निर्णय घेण्यात आला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सर्जा-राजाप्रती कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या सणावर महागाईचे सावट..

उद्रेक न्युज वृत्त :-शेतकरी बांधवांच्या सुख-दुःखात वर्षभर खांद्याला-खांदा लावून राबणाऱ्या सर्जा-राजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा बैलपोळा सण अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे.मात्र,यंदा पोळ्याच्या उत्साहावर...

मॉन्सूनचा प्रभाव कमी; आजपासून सूर्य आग ओकण्याच्या तयारीत..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-काही दिवसांपूर्वी विदर्भात सक्रिय असलेला मान्सून परतीच्या मार्गावर असल्याने आज,सोमवार ७ सप्टेंबरपासून सूर्य आग ओकून तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता प्रादेशिक...

माजी सरपंचांनाच प्रशासक म्हणून कायम ठेवण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील सुमारे १४ हजार २३४ ग्रामपंचायतींवर तत्कालीन सरपंच हे प्रशासक म्हणून नेमण्यात आले होते.अश्यातच माजी सरपंचांच्या सहा महिन्यांच्या काही प्रशासक पदाची...

नागपुरातील ऐतिहासिक ‘मारबत महोत्सव’ आजपासून सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य घटक असलेला ऐतिहासिक 'मारबत महोत्सव' आज,रविवार ६ सप्टेंबरपासून सुरू झाला.या वर्षीचा महोत्सव हा १४५...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!