Monday, September 7, 2026
Homeचंद्रपूरबंद ग्रामपंचायतीचे कुलूप तोडून अज्ञाताने ग्रामपंचायतीची कागदपत्रे जाळली..

बंद ग्रामपंचायतीचे कुलूप तोडून अज्ञाताने ग्रामपंचायतीची कागदपत्रे जाळली..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-ब्रम्हपुरी तालुक्यातील पारडगाव ग्रामपंचायत येथील सुट्टीच्या दिवसांची संधी साधून अज्ञाताने बंद ग्रामपंचायतीचे कुलूप तोडून कार्यालयातील लोखंडी आलमारीतील महत्वाची कागदपत्रे पेट्रोल ओतून जाळल्याची धक्कादायक घटना दोन दिवसांपूर्वी म्हणजेच शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली असून पोलिसांत तक्रार दिल्यानंतर सदरची घटना उघडकीस आली आहे.सदर घटनेबाबत अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करून ब्रम्हपुरी पोलीस प्रशासनाने पुढील तपास सुरू केला आहे.
ब्रम्हपुरी तालुका मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पारडगाव ग्रामपंचायतीच्या समोरील दारातून अज्ञात व्यक्तीने प्रवेश करून लोखंडी आलमारीत ठेवलेले दस्तावेज जमिनीवर ठेवून पेट्रोल टाकून पेटवून दिले.काल रविवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्याने एकच खळबळ माजली.या प्रकरणी ग्रामपंचायतीच्या वतीने पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.घटनास्थळी पोलिसांनी डॉग स्कॉट(श्वान पथक)तसेच फॉरेन्सिक चमूला पाचारण केले.सदर घटनेतील अज्ञात आरोपींचा पोलीस कसून शोध घेत असून एखाद्या दारुड्या व्यक्तीने दारूच्या नशेत सदर प्रकार केला असावा,असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.घटनेचा पुढील तपास ब्रम्हपुरी पोलीस प्रशासन करीत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नागपुरातील ऐतिहासिक ‘मारबत महोत्सव’ आजपासून सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य घटक असलेला ऐतिहासिक 'मारबत महोत्सव' आज,रविवार ६ सप्टेंबरपासून सुरू झाला.या वर्षीचा महोत्सव हा १४५...

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!