Wednesday, April 15, 2026
Homeचंद्रपूरआत्ताची मोठी बातमी.. पाच मुलांचा घोडाझरी तलावात बुडून मृत्यू; दोन सख्खे भाऊ...

आत्ताची मोठी बातमी.. पाच मुलांचा घोडाझरी तलावात बुडून मृत्यू; दोन सख्खे भाऊ तर दोन चुलत भाऊ व एक मित्र..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील घोडाझरी येथे पर्यटनासाठी गेलेल्या सहा मुलांपैकी पाच मुलांचा  तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज,शनिवार १५ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास घडली.
अनिकेत यशवंत गावंडे,तेजस संजय ठाकरे,जनक किशोर गावंडे,यश किशोर गावंडे,तेजस बालाजी गावंडे सर्व राहणार साटगाव कोलारी,ता.चिमूर, जि.चंद्रपूर अशी तलावात बुडून मृत पावलेल्या मुलांची नावे आहेत.सर्व मुले १८ ते २२ वर्षे वयोगटातील आहेत.यातील दोन सख्खे भाऊ असून दोन चुलत भाऊ व एका मित्राचा समावेश आहे.१६ वर्षीय आर्यन हेमराज हिंगोली थोडक्यात बचावला.
घोडाझरी या ठिकाणी ब्रिटिश कालीन तलाव आहे. तलाव व पर्यटनस्थळ असल्यामुळे येथे बारमाही पर्यटकांची गर्दी असते.शनिवार आणि रविवारी तलावावर बाहेरून पर्यटक येतात.आज शनिवारी चिमूर तालुक्यातील साटगाव कोलारी येथील अनिकेत यशवंत गावंडे,तेजस संजय ठाकरे,जनक किशोर गावंडे,यश किशोर गावंडे,तेजस बालाजी गावंडे व आर्यन हेमराज हिंगोली ही सहा मुले पर्यटनासाठी गेली होती.दुपारपासून त्यांनी घोडाझरी तलावावरील पर्यटनाचा आनंद घेतला.त्यानंतर सायंकाळी चारच्या सुमारास नळ पाणीपुरवठा योजनेच्या विहिरी असलेल्या परिसरात सहा मुले पोहण्याकरिता तलावात उतरली.पाण्याची पातळी खोल गेल्याने आणि या परिसरात डोह असल्यामुळे सहाही जण डोहामध्ये बुडाले.अनिकेत यशवंत गावंडे,तेजस संजय ठाकरे,जनक किशोर गावंडे,यश किशोर गावंडे,तेजस बालाजी गावंडे हे पाचही जण बुडाले तर आर्यन हेमराज हिंगोली पाण्यातून बाहेर आला.तलावातून वाचून बाहेर आलेल्या मुलाने ही घटना घटनास्थळी असलेल्या नागरिकांना सांगितली.त्यानंतर अवघ्या काही वेळातच नागभीड पोलीस घटनास्थळी दाखल झाले.पाचही मुले तलावातच बुडालेली होती.अशातच शोध मोहीम राबविल्या नंतर पाचही जणांचे मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आले असून सदर घटनेची माहिती मुलांच्या कुटुंबीयांना साटगाव कोलारी येथे देण्यात आली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील परिसरात वाघिणीने धुमाकूळ घालून गुरुवार,१९ मार्च २०२६ रोजी बाम्पेवाडा येथील ५० वर्षीय वसंत गणपत मेश्राम यांचा जीव घेतला...

आता प्रत्येक लाभार्थी कुटुंबास मिळणार तीन लिटर रॉकेल..

उद्रेक न्युज वृत्त :-जमाना कितीही बदलला तरीही 'जुनं ते सोनं' अशी अवस्था केवळ आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर झाल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र राज्याच्या विविध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!