Monday, September 7, 2026
Homeदेसाईगंजउद्याला देसाईगंज दीक्षाभूमी येथे रमाई उत्सवानिमित्त समाज प्रबोधन तथा नाट्य प्रयोगाचे आयोजन..

उद्याला देसाईगंज दीक्षाभूमी येथे रमाई उत्सवानिमित्त समाज प्रबोधन तथा नाट्य प्रयोगाचे आयोजन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहर बौद्ध समाज कोअर कमीटीच्या वतीने उद्या रविवार दिनांक-९ फेब्रुवारीला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्पर्श देसाईगंज दीक्षाभूमीवर रमाई उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.रमाई उत्सवाचे औचित्य साधून कमिटीच्या वतीने दुपारी १ वाजे समाज प्रबोधन तर रात्रो ७ वाजेच्या सुमारास ‘रमाई झाली महान’ नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे.सदर होऊ घातलेल्या समाज प्रबोधन समारंभाच्या अध्यक्षस्थानी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम तर उदघाटक आमदार तथा माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले असणार आहेत.तसेच कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक म्हणून चंद्रपूर येथील सामाजिक कार्यकर्त्या डॉ.अभिलाषा गावतुरे व पत्रकार,कवी तथा लेखक अविनाश टिपले हे मुख्य मार्गदर्शन करणार आहेत.रात्री ७ वाजताच्या सुमारास कवीवर्य भिमानंद मेश्राम लिखित व दिग्दर्शित डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या सहचरिणी त्यागमुर्ती रमाई यांच्या जिवनावर आधारित ‘रमाई झाली महान’ या नाटकाचे प्रयोग मोफत दाखविण्यात येणार आहे.त्यामुळे
समाज प्रबोधन तथा नाट्य प्रयोगाचा लाभ समस्त जनतेंनी घ्यावा; असे आवाहन देसाईगंज शहर बौद्ध समाज कोअर कमेटीचे अध्यक्ष प्रकाश सांगोळे,प्रवक्ते विजय बन्सोड,सचिव हंसराज लांडगे,कार्याध्यक्ष भिमराव नगराळे,उपाध्यक्ष साजन मेश्राम,सुरज ठवरे सह सुनील सहारे आदिंनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नागपुरातील ऐतिहासिक ‘मारबत महोत्सव’ आजपासून सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य घटक असलेला ऐतिहासिक 'मारबत महोत्सव' आज,रविवार ६ सप्टेंबरपासून सुरू झाला.या वर्षीचा महोत्सव हा १४५...

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!