Monday, May 4, 2026
Homeदेसाईगंजकोट्यवधी रुपयांचा अवैध वाळू उपसा होतो व प्रशासनाकडून एक डकारही घेतली जात...

कोट्यवधी रुपयांचा अवैध वाळू उपसा होतो व प्रशासनाकडून एक डकारही घेतली जात नाही.. -अखेर कोट्यवधी रुपयांच्या अवैध वाळू उपसा प्रकरणी बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू… – आंदोलनस्थळी राकाँचे तालुकाध्यक्ष क्षितिज उके यांची भेट..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-कोट्यवधी रुपयांचा अवैध वाळू उपसा होतो व प्रशासनाकडून एक डकारही घेतली जात नाही; याला काय म्हणावे.गावकरी,ग्रामपंचायत, सुजाण नागरिकांनी तक्रारी,गाऱ्हाणे मांडूनही मुंग गिळून पापड खाणे कितपत योग्य आहे; खरं तर अवैध वाळू उपसा होतांना प्रशासनाने काय केले? याचा उलगडा होणे आवश्यक असल्याने आज,सोमवार ३० डिसेंबर पासून देसाईगंज तहसील कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन नामदेव वसाके यांचे सह सत्यवान रामटेके यांनी सुरू केले आहे.
आंदोलनाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे(शरद पवार गट)देसाईगंज तालुकाध्यक्ष क्षितिज उके तसेच सामाजिक कार्यकर्ते नरेश वासनिक यांनी आंदोलनस्थळी भेट देत संबंधितांवर योग्य ती कारवाई लवकरात-लवकर व्हावी; यासाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे सांगितले.
प्रसंगी आंदोलन कर्त्यांनी म्हटले की,एकीकडे बांधकाम करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना पाच ब्रास वाळूसाठी हा कागद आणा,त्या घाटातून वाळू द्यायची नाही,मोफत वाळू कशी काय मिळणार?  त्यांची नोंद ठेवा,असे नाना तऱ्हेचे नियम लादले जातात.याउलट वाळू चोरट्यांना नदी पात्रातील सारे रान मोकळे केले जातात; हा कुठला न्याय आहे. आमचा जन्मही झाला नसेल त्या काळापासून कोंढाळा-मेंढा वैनगंगा नदी पात्रात रेतीचा साठा तयार झालेला आहे.वाळूचे एक कण तयार व्हायला जवळपास दीड ते दोन वर्ष लागतात.मात्र,आजची स्थिती बघता नदी पात्रातील रेतीची पुरती वाट लागली आहे.एवढ्या मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपशावर प्रशासनाची एकदाही नजर न जाणे ही किती लाजिरवाणी बाब आहे.अवैध वाळू उपशाच्या माध्यमातून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाला आहे.यांस जबाबदार कोण? चोर चोऱ्या करतात,तो त्यांचा कामच आहे; पण त्यावर आवर घालणारी व्यक्तीही त्यांची साथीदार असेल तर ‘चोरांच्या उलट्या बोंबा’ असे म्हणावेच लागेल. अनेकजण म्हणू लागलेत की,आजपर्यंत तुम्ही काय केलेत..! आम्ही काय केलेत म्हणण्यापेक्षा प्रशासनाने त्यावर उपाययोजना काय केल्यात?हेही तितकेच महत्त्वाचे आहे.आम्ही गाऱ्हाणी सांगून तक्रारी केल्या.पण त्या तक्रारींचे झाले काय? कागदाचे पान पलटलेच नाही; त्यामुळे कोट्यवधी रुपयांच्या अवैध वाळू उपसा प्रकरणी आमची लढाई सुरू असणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

चुडाराम बल्हारपुरे यांचा पुणे जिल्ह्यात डंका; ‘जत्रा घडली नागोबाची’ या महानाट्यास पुरस्कार प्रदान.. – यंदाचा राज्यस्तरावरील ११ वा पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विदर्भातील प्रसिद्ध नाटककार तथा साहित्यिक चुडाराम बल्हारपुरे यांना नुकताच शनिवार २ मे रोजी 'जत्रा घडली नागोबाची' या महानाट्यास पुणे जिल्ह्याच्या चाळकवाडी...

कोंढाळा येथे रिद्धी ॲग्रोटेक वेजिटेबल्स डिहायड्रेशन प्लांटचे भव्य उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा येथे आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांच्या हस्ते रविवार ३ मे रोजी रिद्धी ॲग्रोटेक वेजिटेबल्स डिहायड्रेशन प्लांटचे भव्य...

रानडुकराचा हल्ला; जखमीवर तात्काळ उपचार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील दर्भा परिसरात रानडुकराच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मुल्ला पिडसे या जखमी रुग्णाला शासकीय यंत्रणेच्या तत्परतेमुळे वेळेवर उपचार मिळाले आहेत.जंगलव्याप्त...

परीक्षेत अपयश; विद्यार्थ्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील रोंघा गावातील एका तरुणाने बारावी बोर्डाच्या परीक्षेत अपयश आल्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची घटना काल शनिवारी परीक्षेचा निकाल...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!