- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-उकाड्याने नागरिक हैराण झालेले असतांनाच हवामान विभागाने राज्यातील अनेक भागांत पुढील काही दिवस पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने आता या कडक उन्हातून नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.महाराष्ट्र राज्यातील काही भागांत मेघगर्जनेसह पाऊस, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यांचा इशारा देण्यात आला आहे.त्यानुसार, उद्या,सोमवार ४ मे रोजी विदर्भातील काही भागांत जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.यात चंद्रपूर,गडचिरोली यवतमाळ आणि वर्धा या चार जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.या ठिकाणी वादळी वारे,विजांचा कडकडाट आणि काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.याशिवाय नागपूर,गोंदिया,भंडारा,बुलढाणा, अकोला,अमरावती आणि वाशिम या जिल्ह्यांत मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.तर मंगळवार ५ मे रोजी विदर्भातील सर्व जिल्ह्यांत पावसाची शक्यता कायम राहणार आहे.त्यामुळे संपूर्ण विदर्भासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.तसेच,बुधवार ६ मे रोजी कोकण पट्ट्यातही हवामान बदलण्याचे संकेत आहेत.विजांच्या कडकडाटासह अचानक पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी बाहेर पडतांना आवश्यक ती खबरदारी घ्यावी,असे आवाहन करण्यात आले आहे.
- Advertisement -

