Tuesday, July 28, 2026
Homeचंद्रपूर२८ वर्षीय तरुणाची चाकू भोसकून निर्घृणपणे हत्या..!

२८ वर्षीय तरुणाची चाकू भोसकून निर्घृणपणे हत्या..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-एका २८ वर्षीय तरुणाची अज्ञात चार तरुणांनी चाकू भोसकून निर्घृणपणे हत्या केल्याची  खळबळजनक घटना काल,शुक्रवारी २७ डिसेंबरच्या रात्री दहा वाजताच्या सुमारास मुल येथे घडली.त्यामुळे शहरात काहीकाळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.रीतिक अनिल शेंडे वय २८ वर्षे रा.मुल असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,काल शुक्रवारी रात्री रोहीत शेंडे हा पंचायत समिती नजिक असलेल्या नगर पालिकेच्या बस थांबा शेड मध्ये बसला होता.अशातच अचानकपणे येत चार युवकांनी त्याच्यासोबत वाद घातला.वाद सुरू असतांनाच चाकूने पोटावर आणि पाठीवर सपासप वार करून त्याला गंभीर जखमी केले.रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या रोहीतला काही नागरिकांनी मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.तपासणी अंती डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.घटनेची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरताच  रात्री नागरिकांनी घटनास्थळी आणि पोलिस ठाण्यात  मोठा जमाव गोळा झाला होता.घटनेच्या निषेधार्थ आज,शनिवारी मूल मध्ये कडकडीत बंद पुकारण्यात आला.घटनेनंतर मूलमध्ये पोलिस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला आहे.दंगा नियंत्रण पथक सुद्धा तैनात करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बापरे..! तब्बल १९९ किलो गाजांची वाहतूक; दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली पोलिसांनी गांजाची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करून तब्बल १९९.५६० किलो ग्रॅम वजनाच्या गाजांची वाहतूक करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या....

महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीत १७ प्रशिक्षणार्थ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-कौशल्याधारित प्रशिक्षण हे केवळ रोजगार मिळविण्याचे साधन नसून युवकांना स्वावलंबी, आत्मविश्वासू आणि उद्योगक्षम बनविण्याचे प्रभावी माध्यम आहे.उद्योगांच्या गरजेनुसार दर्जेदार प्रशिक्षण घेतल्यास...

वाघोबाची दहशत; तब्बल दहा गावात ‘हाय अलर्ट’..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या सेलू,वर्धा व इतर तालुक्यातील परिसरात तीन वर्षे वयोगटातील तरुण नर वाघोबाची भ्रमंती सुरू असल्याने तब्बल दहा गावात वन विभागाच्या वतीने...

पुढील दोन दिवस पावसाचे; तर आज सात जिल्ह्यात वादळी पाऊस..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-पूर्वी उन्हाळा,पावसाळा व हिवाळा ठरलेल्या मोसमातील महिन्यांतच 'मी आलोय' म्हणायचा.मात्र, गेल्या काही कालावधीपासून नैसर्गिक चक्राच्या बदलांमुळे ऐन पावसाळ्यात पाऊस कधी पडणार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!