Monday, July 27, 2026
Homeचंद्रपूर५० टक्के लाडक्या बहिणी ठरणार अपात्र; सरकारी तिजोरी झाली रिकामी- विजय वडेट्टीवार

५० टक्के लाडक्या बहिणी ठरणार अपात्र; सरकारी तिजोरी झाली रिकामी- विजय वडेट्टीवार

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-राज्य सरकार सध्या मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे.सरकारी तिजोरी रिकामी झाली आहे.राज्याची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर, राज्याच्या कृषीमंत्र्यांना शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याबद्दल बोलावे लागत आहे.राज्याची आर्थिक स्थिती कधी सुधारेल आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी मिळेल,असा प्रश्न वडेट्टीवार यांनी काल,शुक्रवारी पत्रपरिषद घेत उपस्थित केला.
लाडकी बहीण योजनेच्या २८ लाख ७२ हजार लाभार्थी महिलांची नावे आता या योजनेतून वगळण्यात आली आहेत.या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने महिलांवर कठोर नियम आणि अटी लादण्यास सुरुवात केली आहे.येत्या काळात या योजनेतून ५० टक्के लाभार्थी महिलांची नावे वगळली जातील हे आता निश्चित झाले आहे.सत्ताधारी महायुतीतील घटक पक्षांमध्ये सुरू असलेल्या संघर्षात,राज्य चुकीच्या दिशेने जात आहे,राज्यात गुन्हेगारी वाढत असून सरकारची संपूर्ण शक्ती गुन्हेगारांना संरक्षण देण्यात खर्च होत आहे,असाही आरोप माजी विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी काल,शुक्रवारी चंद्रपुरात झालेल्या पत्रपरिषदेत केला आहे.राज्यात गुन्हेगारी घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे.वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्यात सरकार अपयशी ठरत आहे.राज्यात महिलांवरील,विशेषतः अल्पवयीन महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत.सरकार गुन्हेगारांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहे. बीड जिल्ह्यात घडलेल्या घटनेचे ठोस पुरावे असूनही, या प्रकरणात रोख असलेल्या मंत्र्याला पदावरून हटवत नाही; असेही ते म्हणाले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बापरे..! तब्बल १९९ किलो गाजांची वाहतूक; दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली पोलिसांनी गांजाची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करून तब्बल १९९.५६० किलो ग्रॅम वजनाच्या गाजांची वाहतूक करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या....

महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीत १७ प्रशिक्षणार्थ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-कौशल्याधारित प्रशिक्षण हे केवळ रोजगार मिळविण्याचे साधन नसून युवकांना स्वावलंबी, आत्मविश्वासू आणि उद्योगक्षम बनविण्याचे प्रभावी माध्यम आहे.उद्योगांच्या गरजेनुसार दर्जेदार प्रशिक्षण घेतल्यास...

वाघोबाची दहशत; तब्बल दहा गावात ‘हाय अलर्ट’..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या सेलू,वर्धा व इतर तालुक्यातील परिसरात तीन वर्षे वयोगटातील तरुण नर वाघोबाची भ्रमंती सुरू असल्याने तब्बल दहा गावात वन विभागाच्या वतीने...

पुढील दोन दिवस पावसाचे; तर आज सात जिल्ह्यात वादळी पाऊस..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-पूर्वी उन्हाळा,पावसाळा व हिवाळा ठरलेल्या मोसमातील महिन्यांतच 'मी आलोय' म्हणायचा.मात्र, गेल्या काही कालावधीपासून नैसर्गिक चक्राच्या बदलांमुळे ऐन पावसाळ्यात पाऊस कधी पडणार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!