Tuesday, July 21, 2026
Homeभंडारा३३ वर्षाचा कुवारा घोडा बनलेल्या मुलाचे लग्न जुळत नसेल तर यात वडिलाचा...

३३ वर्षाचा कुवारा घोडा बनलेल्या मुलाचे लग्न जुळत नसेल तर यात वडिलाचा काय दोष? – लग्नासाठी मुलाने केला वडिलाचा खून..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-आई-वडील लहानाचे मोठे करतात,ते केवळ धरतीवर वजा होण्यासाठी नाही; तर जीवनात येणाऱ्या संकटांना झेलून,स्वतःच्या पायावर उभे व्हावे व जीवनाचे साफल्य करून मुलांना “जा..जगून घे..आपले पुढील जीवन” असे म्हणून सारे रान मोकळे करून देत असतात.पण,आजही अनेकजण केवळ आई-वडिलांच्याच भरवशावर जीवन जगतांना दिसून येतात. अनेकांना वडिलोपार्जित संपत्ती वा इतर ऐशो आरामचे जीवन जरी मिळाले नसले तरीही स्वबळावर उभे करण्याची ताकद उराशी बाळगून त्या दिशेने प्रयत्न केले पाहिजेत.ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले,त्यांना विचारून बघा की जीवनाचे खरे संघर्ष काय असते तर..इकडे आम्ही लग्न होत नाही,माझे कुठलेही कामच होत नाही,तो पुढे गेला मी मागे राहिलो,याच बुचकळ्यात पडून ‘जैसे थे’ अवस्थेत असतो आणि दोष देतो ते आपल्या आई- वडिलांना.अश्याच प्रकारे भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यात एका क्षुल्लकशा कारणासाठी पोटच्या गोळ्याने आपल्या वडिलाचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे.लाखांदूर तालुक्यातील आथली गावचा रहिवासी असलेल्या ३३ वर्षीय मुलाने “माझी वय झाली तरीही माझे लग्न करून देत नाही” असे म्हणत वडिलांशी वाद घातला आणि वडिलांच्या डोक्यावर वीट मारली.यात वडील जिवानिशी ठार झाल्याची खळबळजनक घटना शुक्रवारच्या रात्री आठ वाजताच्या सुमारास घडली.५७ वर्षीय पुरुषोत्तम कुंभलवार असे मृत पावलेल्या वडिलाचे नाव आहे,तर प्रदीप पुरुषोत्तम कुंभलवार रा.आथली,ता.लाखांदूर असे आरोपी मुलाचे नाव आहे.प्रकरणी आई रेवता कुंभलवार यांच्या तक्रारीवरून लाखांदूर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपी प्रदीपला अटक केली आहे.
शुक्रवारच्या रात्री ३५ वर्षीय मोठा भाऊ प्रेमकुमार, आई रेवता,वडील पुरुषोत्तम आणि आरोपी प्रदीप हे सर्वजण जेवण करीत होते.जेवण झाल्याने प्रेमकुमार बाहेर गेला. यातच आरोपी प्रदीपने वडील पुरुषोत्तम यांना मोठ्या भावाचेही लग्न झाले नाही आणि माझी वय झाली तरीही माझे लग्न करून देत नाही,असे म्हणून वडिलांशी वाद घातला.वाद आणखी वाढल्याने प्रदीपने घराच्या दारा समोरील वीट उचलली आणि वडिलाच्या डोक्यावर मारली.यात डोक्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होऊन ते खाली पडले.जवळच असलेल्या पत्नी रेवता यांनी तात्काळ गावातील तंटामुक्त अध्यक्षांना माहिती देत पुरुषोत्तमला रुग्णवाहिकेने लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात नेले.पण,तपासणी अंती डॉक्टरांनी पुरुषोत्तमला मृत घोषित केले.घटनेने समाजमन सुन्न झाले आहे.महत्वाचे म्हणजे,३३ वर्षाचा कुवारा घोडा बनलेल्या मुलाचे लग्न जुळत नसेल तर यात वडिलाचा दोष काय? ज्या वयात शिक्षण वा आपले करिअर करायचे असते,अश्यावेळेस दुर्जनांची संगत आणि वाम मार्गाला जाऊन आयुष्याचे वाटोळे करून घेतले जाते व नंतर दोष दिले जाते ते केवळ आई-वडिलांना.सध्याच्या घडीला अनेकांचे वय निघून गेले तरीही लग्न जुळत नाही.मुली मिळणे कठीण झाले आहे.मुलीचे वडील मुलीच्या भवितव्याची तजवीज करूनच विवाहास होकार देणार की नाही,त्यामुळे सर्वप्रथम स्वतःच्या करिअरकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.वेळ कुणासाठी थांबत नाही,एकदा कां वय निघून गेली की जीवनाचे वाटोळे झाले म्हणून समजा आणि विनाशकाले विपरीत बुध्दी सुचल्याशिवय राहणार नाही.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आंधळी येथे मोफत नेत्रसेवा शिबिर संपन्न; ११७ जणांची तपासणी,तर ३२ रुग्णांवर होणार मोफत शस्त्रक्रिया..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार नेत्रसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महात्मे आय बँक हॉस्पिटल नागपूर,समता फाउंडेशन मुंबई,आधार ग्रामीण विकास संस्था आंधळी आणि गट...

सोनम वांगचुक समर्थनाथ कुरखेड्यात रिपाईच्या वतीने निदर्शने व निवेदन सादर..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-परीक्षांच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणे सुरू झाले आहे. रात्रंदिवस मेहनत घेऊन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना काही दिवसांतच कळतेय की अगोदरच पेपरची कॉपी...

डीएपी खताच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम; शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पर्यायी खतांचा वापर करण्याचे आवाहन.. -प्रत्यक्ष खताच्या गोणीवरील छापील किंमत पाहूनच खत खरेदी करावे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-डीएपी खताच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम झाल्याने राज्यासह गडचिरोली जिल्ह्यातही डीएपी खताचा पुरवठा अपेक्षेप्रमाणे होत नसल्याने शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पर्यायी खतांचा...

नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन..पुढील चोवीस तास महत्वाचे; चार जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्यातील विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे चित्र आहे. हवामान विभागाने नुकतेच १९ जुलै ते २३ जुलै दरम्यान पाच दिवसांसाठी जोरदार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!