Wednesday, September 2, 2026
Homeचंद्रपूर१६ वर्षीय दोन मुलांचा नदीत बुडून मृत्यू..! - दुपारच्या घटनेने हळहळ..

१६ वर्षीय दोन मुलांचा नदीत बुडून मृत्यू..! – दुपारच्या घटनेने हळहळ..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यात आज, शनिवार १६ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास नदीत पोहायला उतरलेल्या दोन १६ वर्षीय मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली.आयुष दीपक गोपाले वय १६ वर्षे व जीत टीकाराम वाकडे वय १६ वर्षे दोघेही रा.महालक्ष्मी नगर,सिंदेवाही,जि.चंद्रपूर अशी मृतकांची नावे आहेत.दोघेही दहावीत शिकत होते.घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
आयुष व जीत हे दोघेही शाळेला कृष्ण जन्माष्टमीची सुट्टी असल्याने आज शनिवारी दुपारच्या सुमारास सिंदेवाही शहरापासून काही अंतरावर असलेल्या टेकरी गावाजवळील नदी तीरावर फिरायला गेले होते.फिरून झाल्यानंतर दोघेही नदीत आंघोळीसाठी उतरले आणि पोहू लागले.पोहत असतांनाच पाण्याचा अंदाज न आल्याने खोल पाण्यात गेले.खोल पाण्यात जाताच दोघांचाही नदीत बुडून मृत्यू झाला. परिसरातील नागरिकांना दोघे पाण्यात बुडाल्याची माहिती मिळताच सिंदेवाही पोलिसांना कळविण्यात आले.पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचाव पथकाद्वारे दोघांचे मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.घटनेचे दोन्ही कुटुंबियांवर मोठा आघात झाला असून परिसरात शोककळा पसरली आहे.पुढील तपास सिंदेवाही पोलीस प्रशासन करीत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जागतिक नारळ दिन विशेष..! नारळ लागवड; शाश्वत उत्पन्नाचा ‘कल्पवृक्ष’..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आज बुधवार २ सप्टेंबर दरवर्षी २ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक नारळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. नारळाच्या झाडाचा जवळपास प्रत्येक भाग उपयोगात...

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

आजपासून बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांसाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी आज,मंगळवार १ सप्टेंबर पासून 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड (एनसीएमसी)अनिवार्य करण्यात आले...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!