Thursday, April 16, 2026
Homeभंडाराशिक्षक भरती प्रक्रिया बंद असतांना शिक्षकांची नियुक्ती; मुख्याध्यापकासह शिक्षकांची चौकशी..

शिक्षक भरती प्रक्रिया बंद असतांना शिक्षकांची नियुक्ती; मुख्याध्यापकासह शिक्षकांची चौकशी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-बनावट शालार्थ आयडी,शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी व अपात्र मुख्याध्यापक भरती घोटाळाप्रकरणी उपसंचालक उल्हास नरड यांच्यासह कार्यालयातील लिपिक,इतर कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली होती.सायबर पोलिसांनी दाखल गुन्ह्यात पुन्हा नरड यांना अटक केली.माजी उपसंचालक अनिल पारधी, वैशाली जामदार आणि प्रभारी उपसंचालक चिंतामण वंजारी यांनाही अटक झाली आहे.यांना अटक होताच भंडारा जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी रवींद्र सलामे भूमिगत झाले.तेव्हापासून त्यांनी कार्यालयात पाय ठेवले नाही. असे असतांना त्यांच्याकडील पदभार काढण्यात आला आणि आता तर त्यांची कार्यालयीन बदली सुध्दा गडचिरोली जिल्ह्यात झाल्याचे पुढे येत आहे.या सबंध प्रकरणाची चौकशी सुरू असतांना भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयातील शाळेत वर्ष २०१७ ला शिक्षक भरती प्रक्रिया बंद असतांना शिक्षकाची नियुक्ती केल्याचे आढळून आल्याने या विद्यालयाच्या मुख्याध्यापकासह तीन शिक्षक चौकशीच्या भोवऱ्यात आले असल्याचे शिक्षण विभागात दबक्या आवाजात बोलले जात आहे. मुख्याध्यापकासह तीन शिक्षकांची चौकशी करिता शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी चौकशी समिती गठित केली होती.मात्र,त्या चौकशी समितीवर झालेल्या बदल्यांचा तसेच सेवानिवृत्तीचा प्रभाव झाल्याने सदर समिती पुनर्गठित करण्याची वेळ आली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कामगारांसाठी दिलासादायक निर्णय; आता गोण्यांचे वजन राहणार ५० किलोपर्यंतच..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-डोक्यावर,पाठीवर ओझे वाहून नेणारे, अंगमेहनतीची कामे करणारे कामगार म्हणजेच माथाडी(हमाल)कामगारांना दररोज जड गोण्या(पोते) उचलण्याचे काम करावे लागते.धान,कांदा,बटाटा आणि इतर शेतमालाच्या व्यवहारात अनेक...

आज प्रोजेक्ट ‘उडान’ अंतर्गत १ हजार २७८ युवकांना रोजगार.. -नक्षलवाद विरोधी अभियानासाठी ३१ चारचाकी वाहनांचे लोकार्पण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आधुनिक युगाच्या बदलत्या गरजेनुसार युवकांनी शिक्षणासोबत तांत्रिक कौशल्य आत्मसात करून स्वतःमध्ये आवश्यक बदल घडवून आणावेत, असे आवाहन राज्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल...

चार शाळकरी मुलांचा खड्ड्यातील पाण्यात बुडून मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नांदेड :-शाळेची सुट्टी झाल्यानंतर घराकडे परतणाऱ्या चार अल्पवयीन शाळकरी मुलांनी रत्याच्या कडेला असलेल्या मार्गावरील खड्ड्यातील पाण्यात उतरून आंघोळ करत असतांनाच खोल पाण्याचा...

झाडीपट्टीतील प्रसिद्ध नाटककार तथा साहित्यिक चुडाराम बल्हारपुरे अहिल्यानगर जिल्ह्यात सन्मानित.. – ‘सैराट’ चित्रपटाची शुटींग जिथे पार पडली; अशा महाविद्यालयात वितरण सोहळा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-झाडीपट्टीतील प्रसिद्ध नाटककार तथा साहित्यिक चुडाराम बल्हारपुरे यांचा नुकताच अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथे सपत्नीक सत्कार करण्यात आला.कर्जत तालूका साहित्यप्रेमी मंडळ व...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!