- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-बनावट शालार्थ आयडी,शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी व अपात्र मुख्याध्यापक भरती घोटाळाप्रकरणी उपसंचालक उल्हास नरड यांच्यासह कार्यालयातील लिपिक,इतर कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली होती.सायबर पोलिसांनी दाखल गुन्ह्यात पुन्हा नरड यांना अटक केली.माजी उपसंचालक अनिल पारधी, वैशाली जामदार आणि प्रभारी उपसंचालक चिंतामण वंजारी यांनाही अटक झाली आहे.यांना अटक होताच भंडारा जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी रवींद्र सलामे भूमिगत झाले.तेव्हापासून त्यांनी कार्यालयात पाय ठेवले नाही. असे असतांना त्यांच्याकडील पदभार काढण्यात आला आणि आता तर त्यांची कार्यालयीन बदली सुध्दा गडचिरोली जिल्ह्यात झाल्याचे पुढे येत आहे.या सबंध प्रकरणाची चौकशी सुरू असतांना भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयातील शाळेत वर्ष २०१७ ला शिक्षक भरती प्रक्रिया बंद असतांना शिक्षकाची नियुक्ती केल्याचे आढळून आल्याने या विद्यालयाच्या मुख्याध्यापकासह तीन शिक्षक चौकशीच्या भोवऱ्यात आले असल्याचे शिक्षण विभागात दबक्या आवाजात बोलले जात आहे. मुख्याध्यापकासह तीन शिक्षकांची चौकशी करिता शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी चौकशी समिती गठित केली होती.मात्र,त्या चौकशी समितीवर झालेल्या बदल्यांचा तसेच सेवानिवृत्तीचा प्रभाव झाल्याने सदर समिती पुनर्गठित करण्याची वेळ आली आहे.
- Advertisement -

