Sunday, May 24, 2026
Homeचंद्रपूरवडिलांनी विकत घेतले घर; मुलगा, सुनेने केला छळ...न्यायालयाने दिला दणका; दर महिना...

वडिलांनी विकत घेतले घर; मुलगा, सुनेने केला छळ…न्यायालयाने दिला दणका; दर महिना चार हजार रुपये आई-वडिलांना देण्याचे दिले आदेश…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

चंद्रपूर(बल्लारपूर) :- बल्लारपूर येथील दीनदयाल वॉर्डातील रहिवासी जानकीदेवी लक्ष्मण मांझी यांच्या याचिकेवर ३१ ऑगस्टला बल्लारपूर न्यायालयाने सुनावणी केली. त्यांची सून व मुलाला वडिलांचे राहते घर खाली करून दर महिना चार हजार रुपये आई- वडिलांना देण्याचे आदेश दिले आहेत.

बल्लारपूर पेपर मिलमधून सेवानिवृत्त झाल्यानंतर लक्ष्मण मांझी यांनी पंडित दीनदयाळ वॉर्डात घर विकत घेतले व पत्नी तसेच आपला मुलगा आणि सुनेसह राहू लागले; परंतु, काही दिवसानंतर मुलगा व सुनेने त्यांना मानसिक व शारीरिक त्रास देणे सुरू केले.हा त्रास असहनीय झल्यानंतर जानकीदेवी मांझी यांनी महिला अधिनियमचे कलम १९ चे अंतर्गत ॲड. सुनील पुरी यांच्या माध्यमातून मुलगा जितेंद्र मांझी व सून मीना मांझी यांच्या विरोधात बल्लारपूर न्यायालयात याचिका दाखल केली.न्यायाधीश अनुपम एस.शर्मा यांनी निर्णय देताना मुलगा व सुनेला दोन महिन्यांच्या आत घर खाली करण्याचा आदेश दिला व मांझीचा मुलगा जितेंद्र याला दर महिना चार हजार गुजराण भत्ता देण्याचे आदेश दिले.मुलगा व सून यांना त्यांच्या घरी न जाण्याचे आदेश दिले.वयोवृद्ध जानकीदेवी यांची पैरवी ॲड.सुनील पुरी यांनी केली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देशात जनगणनेची प्रक्रिया सुरू झाली; पण ओबीसी समाजासाठी स्वतंत्र रकानाच नाही.. देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर धडकणार ‘भव्य मोर्चा’..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):- "आमची संख्या,आमचा हक्क,आमचा सन्मान!" आणि "जनगणनेत स्वतंत्र कॉलम,आमचा हक्क!" अशी गगनभेदी गर्जना करत देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात...

रोजगार हमी योजनेच्या कायद्याची जागा घेणाऱ्या ‘व्हीबी-जी राम जी’ योजनेत १२५ दिवस काम देण्याची हमी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच कालावधीपासून सुरू असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-२००५ कायद्याची जागा आता 'विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजिविका...

सामान्य माणसाचा जीव २५ लाखांचा ठरवत असाल तर तुम्ही स्वतः वाघासमोर उभे राहा; आम्हीही तुम्हाला २५ लाख देतो..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नुकतेच चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही परिसरात वाघाच्या हल्ल्यात चार महिलांचा मृत्यू झाला.या घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.या पार्श्वभूमीवर सामाजिक...

वाढदिवसाचा कार्यक्रम असल्याचा बनाव; बालविवाहात सरकारी पाहुण्यांची एंट्री..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह २० वर्षीय तरुणासोबत लावल्या जात असल्याची माहिती नागपूर जिल्हा बालसंरक्षण कक्षाला प्राप्त होताच पथकाने अल्पवयीन मुलीची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!