Sunday, September 20, 2026
Homeवर्धालाईट गेली दोन तास अन् तरुणाने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच लावला फोन....

लाईट गेली दोन तास अन् तरुणाने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच लावला फोन….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

वर्धा :-जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील केळझर गावातील रहिवासी असलेल्या हर्षल नांनावरे तरुणाने वारंवार होणाऱ्या खंडित वीज पुरवठ्याच्या त्रासापायी थेट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच फोन लावून टाकला.

मुसळधार पावसामुळे गावातील वीज पुरवठा खंडित झाला होता.त्यानुसार लाईट ये-जा करीत असल्याने विद्युत वितरण कंपनीमध्ये आपबिती सांगूनही वीज पुरवठ्याच्या समस्येतून मार्ग निघू न शकल्याने हर्षल नांनावरे युवकाने थेट मुख्यमंत्री यांचा फोन नंबर मिळवला व हिंमत दाखवत सरळ फोन लावला असता मुख्यमंत्री यांचे विशेष कार्याधिकाऱ्यांनी फोन उचलून समस्या ऐकून घेतली.महत्वाचे म्हणजे हर्षल वीज पुरवठा खंडित होत असल्याने त्रासून गेला होता. त्यानुसार त्याने सांगितले की,सुरुवातील दोन तास लाईट गेली.समस्या ऐकताच विशेष कार्याधिकारी अचंभित झाले व त्यांनी किमान दोनच तास लाईट गेली म्हणून थेट मुख्यमंत्री यांना फोन लावता काय?असे म्हणून हर्षलची समजूत काढली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

क्षुल्लकशा कारणावरून बाप-लेकात वाद; बेदम मारहाणीत बापाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-अगदी क्षुल्लकशा कारणावरून बाप-लेकात वाद झाला खरी,पण रागाच्या भरात ३० वर्षीय मुलाने  वडिलांना काठीने बेदम मारहाण केल्याने मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या...

चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात; तीन जणांचा मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-मुंबईतील कोस्टल मार्गावर आज,रविवार २०  सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाला.मरीन ड्राईव्हकडून...

आता शेतकऱ्यांना मोबाइल ॲपद्वारेही करता येणार ई-पीक पाहणी नोंदणी..

उद्रेक न्युज वृत्त :-शासनाकडून महसूल विभागातील सहाय्यकांकडून ११ ऑगस्ट २०२६ पासून खरीप ई-पीक पाहणी सुरू करण्यात आली आहे.मात्र,काही तांत्रिक समस्येमुळे पीक पाहणीची प्रक्रिया अतिशय...

उद्याला गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी विद्यापीठाची खरीप शिवार फेरी.. – एकाच ठिकाणी २२८ पीक वाण व तंत्रज्ञान शिफारशींची प्रात्यक्षिके व शास्त्रज्ञांशी थेट संवादाची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला,कृषी विभाग महाराष्ट्र शासन आणि प्रकल्प संचालक आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने २० सप्टेंबर ते २२ सप्टेंबर २०२६...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!