Saturday, May 2, 2026
Homeचंद्रपूररेती तस्कराची मुजोरी; तलाठ्यास धक्काबुक्की करीत ट्रॅक्टर पळवला..

रेती तस्कराची मुजोरी; तलाठ्यास धक्काबुक्की करीत ट्रॅक्टर पळवला..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :- ‘चोरी तर चोरी वरून शिनाजोरी’ केल्याचा धक्कादायक प्रकार चंद्रपूर जिल्ह्याच्या भद्रावती तालुक्यात आज,गुरुवारी ३० जानेवारीला उघडकीस आला आहे.अवैध वाळू भरलेला ट्रॅक्टर तलाठ्याने कारवाईसाठी अडविला असता चक्क वाळू तस्कराने धक्काबुक्की करीत ट्रॅक्टर पळविल्याने रेती तस्करांची मुजोरी कायम असल्याचे दिसून येत आहे.याप्रकरणी तहसीलदारांच्या सूचनेनुसार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
माहितीनुसार,भद्रावती तालुक्यातील कारेगाव येथे  अवैध वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती तलाठी गीते यांना मिळाली.त्यांनी कारेगाव येथे जाऊन अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला अडविले.तलाठी कारवाई करीत असतांनाच चक्क तलाठ्याला धक्का देत ट्रॅक्टर चालकाने तलाठी यांच्या समोरूनच ट्रॅक्टर पळवून नेला.घटना घडत असतांना बहुसंख्य नागरिक गोळा होत सदर प्रकाराचा व्हिडिओ काही नागरिकांनी काढून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.सदर घटनेची माहिती भद्रावतीच्या तहसीलदार भांडारकर यांना देण्यात आली.त्यांच्या सूचनेनुसार शेगाव पोलिसांत सदर प्रकाराची तक्रार दाखल करण्यात आली असून रेती तस्करावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

लाडक्या बहिणींना मोठा झटका; लाखो महिला अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील अनेक कुटुंबांसाठी आधार देणारी व महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणारी महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकारने जुलै-२०२४ पासून सुरू केलेली 'मुख्यमंत्री-माझी लाडकी...

पोलीस भरतीत पात्र ठरलेले युवक-युवतीचा कुरखेडा मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने सत्कार..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीत कुरखेडा शहराच्या मुस्लिम समाजातील एक युवक व एक युवती पात्र ठरले आहे.प्रथमच शहरातील मुस्लिम समाजाची युवक-युवती पोलीस दलात दाखल...

बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; यंदाही मुलींनीच मारली बाजी..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या फेब्रुवारी- मार्च-२०२६ बारावी परीक्षेचा निकाल आज,शनिवार २ मे जाहीर करण्यात...

येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या नावात आईचे नाव अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-आईच्या योगदानाला विशेष सन्मान देण्यासाठी,लिंग समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सामाजिक समतोल राखण्यासाठी आता महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या ओळखीच्या पद्धतीत महत्त्वपूर्ण बदल...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!