Monday, July 13, 2026
Homeचंद्रपूरमैत्रिणींसोबत खेळत असतांना अचानक खाली कोसळली अन् क्षणात जीव गमावून बसली..

मैत्रिणींसोबत खेळत असतांना अचानक खाली कोसळली अन् क्षणात जीव गमावून बसली..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या भद्रावती शहरात एक हृदयद्रावक घटना मंगळरवाच्या सायंकाळी उघडकीस आली.एका १६ वर्षीय विद्यार्थिनीचा मैत्रिणींसोबत बॅडमिंटन खेळता-खेळता अचानकपणे तोल गेला आणि ती खाली कोसळली.यात डोक्याला गंभीर मार लागल्याने मृत्यू झाला.अनुष्का अजय यादव वय १६ वर्षे,रा.आयुध निर्माणी वसाहत,भद्रावती,जि.चंद्रपूर असे मृत पावलेल्या विद्यार्थिनीचे नाव असून ती ११ व्या वर्गात शिक्षण घेत होती.
अनुष्का ही नेहमीप्रमाणे मैत्रिणींसोबत काल मंगळवारच्या सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास आपल्या वसाहतीसमोरील खुल्या मैदानात बॅडमिंटन खेळत होती.खेळता-खेळता ती अचानकपणे खाली कोसळून मुख्य मार्गावर पडल्याने अनुष्काच्या डोक्याला गंभीर मार लागला.डोक्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होऊ लागल्याने उपस्थित मैत्रिणींनी आरडा-ओरड करताच परिसरातील नागरिकांनी धाव घेत तिला तात्काळ उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले.रुग्णालयात उपचार सुरू असतांनाच अनुष्काची प्राणज्योत मालवली. घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून यादव कुटूंबीय शोकसागरात बुडाले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

यालाच म्हणतात खरे राजकारण..! स्थानिक आमदारांची चुप्पी; तर बाहेरच्या आमदारांना चिंता..

उद्रेक न्युज वृत्त  ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-काही कालावधीपासून राज्याच्या विविध भागात अवैध रेती उत्खनन आणि रेती तस्करीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.रेतीतून मिळणारा बक्कळ पैसा अनेकांना करोडपती,तर काहींना रोडपती...

तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त; दोन आरोपींना अटक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-शांतीनगर पोलिस ठाणे हद्दीत नागपूर गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त करून दोन आरोपींच्या मुसक्या...

सिंदेवाहीत माकडांची दहशत कायम; दोन दिवसांत दोन जणांवर हल्ले,नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-सिंदेवाही शहरात माकडांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढतच चालला असून दोन दिवसांत दोन नागरिकांवर हल्ले झाल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे वनविभागाने...

राज्यात ‘किलकारी’ उपक्रमात वर्धा पहिल्या,चंद्रपूर दुसऱ्या,वाशीम तिसऱ्या तर गडचिरोली चौथ्या स्थानावर..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयांतर्गत गरोदर माता,माता आणि बालकांच्या आरोग्याविषयी डिजिटल साक्षरता व जनजागृती करणाऱ्या ‘किलकारी’(Kilkari Mobile Audio Services)उपक्रमात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!