Thursday, April 16, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआजपासून वाढणार वादळी पावसाची तीव्रता..!

आजपासून वाढणार वादळी पावसाची तीव्रता..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-आज,बुधवार १८ मार्चपासून ते २० मार्च दरम्यान वादळी पावसाची तीव्रता आणि क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे.या काळात विदर्भ,मराठवाडा, खान्देश आणि मध्य महाराष्ट्रात ठिकठिकाणी ढगाळ वातावरणासह वादळी पावसाची शक्यता आहे.काही जिल्ह्यांमध्ये गारपीट होऊ शकते.तर २१ मार्चपासून हवामान स्थिर होईल.मेघगर्जना आणि विजेच्या कडकडाटाच्या वेळी नागरिकांनी व शेतकऱ्यांनी स्वतःची व पाळीव जनावरांची सुरक्षितता सुनिश्चित करावी.अशा वेळी झाडाखाली,टिनशेडखाली,तसेच विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांच्या जवळ उभे राहणे टाळावे,असे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.विशेषतः देशाच्या अनेक भागांमध्ये गेल्या तीन दिवसांपासून वादळ,पाऊस आणि गारपिटीचा जोर सुरू आहे.भारतीय हवामान खात्यानुसार,आज १८ मार्चपासून तीव्र वेस्टर्न डिस्टर्बन्स(पश्चिमी विक्षोभ) सक्रिय होत आहे.यामुळे जम्मू-काश्मीर,लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे.तर पंजाब,राजस्थान, मध्य प्रदेश आणि पश्चिम उत्तर प्रदेशात मेघगर्जनेसह वादळ आणि पावसाची शक्यता आहे.राजस्थानमध्ये दोन दिवस झालेल्या पाऊस आणि गारपिटीनंतर उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे.सोमवारी राज्यातील अनेक शहरांमध्ये कमाल तापमान सामान्यपेक्षा कमी नोंदवले गेले.रात्री थंडी वाढल्याने काही ठिकाणी किमान तापमान १५ अंश सेल्सिअसच्या खाली गेले.उत्तर प्रदेशात गेल्या २४ तासांत अनेक ठिकाणी हलका पाऊस आणि मेघगर्जना झाली.शामली जिल्ह्यात काही ठिकाणी गारपीटही झाली.पूर्व यूपीमध्येही हलक्या सरी पडल्या आणि काही भागांत वादळ आले.हवामान बदलल्याने तापमानात घट नोंदवली गेली आणि पारा ४० अंश सेल्सिअसच्या खाली आला.छत्तीसगडमध्ये काल मंगळवारी उष्णतेच्या लाटेत अचानक हवामान बदलले आणि अनेक ठिकाणी पावसासह गारपीट झाली. गरियाबंद जिल्ह्यातील आमामोरा-ओड डोंगर परिसरात दाट धुके पसरून जोरदार पावसासह गारापीठ झाली.तर एक दिवसापूर्वी गरियाबंद जिल्ह्यात वीज कोसळून एक तरुण भाजला होता.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील परिसरात वाघिणीने धुमाकूळ घालून गुरुवार,१९ मार्च २०२६ रोजी बाम्पेवाडा येथील ५० वर्षीय वसंत गणपत मेश्राम यांचा जीव घेतला...

आता प्रत्येक लाभार्थी कुटुंबास मिळणार तीन लिटर रॉकेल..

उद्रेक न्युज वृत्त :-जमाना कितीही बदलला तरीही 'जुनं ते सोनं' अशी अवस्था केवळ आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर झाल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र राज्याच्या विविध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!