उद्रेक न्युज वृत्त :-आताच्या काळात एखाद्या रिकामटेकड्या व्यक्तीने लग्न करतो म्हटले तर काही खरे नाही.आता लग्नाची चित्रे पार बदलून गेली आहेत.हुंडा पद्धत बंद होऊन आता मुलाकडचेच लग्नाचा खर्च उचलण्यास तयार आहेत.मुलगी कोणत्याही जातीची किंवा गरीब असली तरी चालेल,अशी भूमिका अनेक वर पक्षांनी घेतली आहे.लग्न जुळवण्यासाठी अनेक संस्था आणि मध्यस्थ सक्रिय झाले असून,त्यासाठी मोठी रक्कम उकळली जात आहे.लग्नासाठी वधू पक्षाकडून आता “स्टायलिश नवरा” हवा,अशी पहिली अट असते. त्यासोबतच सरकारी नोकरी किंवा मोठे सॅलरी पॅकेज, स्वतःचा बंगला,गाडी आणि शहरात वास्तव्य.अश्यातच शेतकरी वरांना मात्र स्पष्ट नकार दिला जात आहे.या अवास्तव अपेक्षांमुळे लग्नाचे वय उलटून जात आहे. वाढत्या वयामुळे तरुणांमध्ये टक्कल पडणे,लठ्ठपणा, मानसिक तणाव यांसारख्या समस्या निर्माण होत आहेत.त्यातच,वयाची ३० ते ३५ वर्षे उलटून गेल्यावर नाईलाजाने घटस्फोटित स्थळांचा विचार करण्याची वेळ येत आहे.विशेषतः मुलांच्या तुलनेत मुलींचे प्रमाण घटल्याने वधू पक्षाचे भाव वधारले आहेत.कमी शिक्षित मुलींनाही आता उच्चशिक्षित आणि श्रीमंत पती हवा असल्याने मध्यमवर्गीय आणि सुशिक्षित बेरोजगार तरुणांची लग्ने रखडली आहेत.त्यामुळे ग्रामीण व शहरी भागात लग्नाचे चित्र कमालीचे बदलले आहे.पूर्वी ज्येष्ठ मंडळी सोयरिकी जुळवत असत,मात्र आताच्या फाइव्ह जी आणि डिजिटल युगात ही जागा शादी डॉट कॉम, इंस्टाग्राम आणि फेसबुकने घेतली आहे.विशेष म्हणजे, मागील काही वर्षांत वधू पक्षाच्या अपेक्षा इतक्या वाढल्या आहेत की,उपवर मुलांच्या पालकांना हुंडा नको,लग्नाचा खर्चही आम्हीच करतो,फक्त मुलगी तरी द्या,असे म्हणण्याची वेळ आली आहे.शिक्षण आणि करिअरच्या शर्यतीत आता भेटीगाठी घेण्यापूर्वीच मोबाइलवर बायोडाटा आणि फोटोंची देवाणघेवाण होत आहे.तिथेच होकार अन् तिथेच नकार ठरवला जातो. यामुळे पारंपरिक कांदे-पोहे कार्यक्रम आता कमी झाले असून,सोशल मीडियावरूनच नाती जोडली किंवा तोडली जात आहेत.
अजी लग्नाचा खर्चही आम्हीच करतो; फक्त मुलगी तरी द्या.! – वधू पक्षाचे भाव वधारले..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

