- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-शाळेला सुट्टी असल्याने तीन मित्र सहा किलोमिटर अंतरावर असलेल्या नदीवर गेले.नदीवरील बंधाऱ्यातील दृश्य पाहून एकास आंघोळ करण्याची इच्छा झाल्याने त्याने उडी मारली.उडी मारताच खाली गेला,तो वर आलाच नाही आणि बुडून मृत्यू झाला. अश्यातच सहकारी दोन मित्र घाबरले.घटना घडून रात्र झाली तरीही गप्प राहिले.कुटुंबीयांनी शोधाशोध केली असता सदर प्रकरण उजेडात आले.सदरची घटना चंद्रपूर जिल्ह्याच्या सावली शहरापासून सहा किलोमिटर अंतरावर असलेल्या चिमढा नदीत घडली.सोहम प्रमोद मोहुर्ले वय १५ वर्षे,रा.ता.सावली, जि.चंद्रपूर असे नदीत बुडून मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.सोहम हा सावली येथील रमाबाई आंबेडकर विद्यालयात इयत्ता दहाव्या वर्गात शिक्षण घेत होता.
रविवारी शाळेला सुट्टी असल्याने सोहम आणि त्याचे दोन मित्र सावली शहरापासून सहा किलोमिटर अंतरावर असलेल्या चिमढा नदी किनारी फिरायला गेले.नदी किनारी पोहचताच आंघोळ करण्यासाठी सोहमने नदीवरील बंधाऱ्यात उडी मारली.उडी मारली तेव्हा मित्र सोबत होते.सोहम पाण्याबाहेर न आल्याने दोघेही घाबरून घरी पोहचले.रात्र होऊनही आपला मुलगा घरी आला नसल्याने मोहुर्ले कुटुंबीयांनी परिसरात विचारपूस केली.काहींनी दुपारच्या सुमारास मित्रांबरोबर फिरायला गेला असल्याचे सांगितल्याने प्रकरणाची माहिती झाली.त्यानुसार कुटुंबीयांनी सावली पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली.रात्र झाल्याने शोधमोहीम थांबविण्यात आली.परत काल सोमवारी शोधाशोध केली असता सायंकाळी सहाच्या सुमारास सोहमचा मृतदेह सापडून आल्याने पोलिसांनी मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला.घटनेने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
- Advertisement -

