- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील चोप ग्रामपंचायतीचे सरपंच नितीन मधुकर लाडे यांना आज,शनिवार ११ ऑक्टोंबर रोजी पुण्याच्या पत्रकार भवन नवी पेठ येथे नालंदा ऑर्गनायझेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित “महाराष्ट्र रत्न सन्मान सोहळा-२०२५” अंतर्गत ग्रामपंचायत क्षेत्रातील गावासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान करून सपत्नीक सन्मानित करण्यात आले.
नालंदा ऑर्गनायझेशन महाराष्ट्र राज्य या संस्थेतर्फे दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्यांचा “महाराष्ट्र रत्न सन्मान सोहळा” आयोजित करून सन्मानित करण्यात येते.यंदाच्या सोहळ्यास चोप ग्रामपंचायतीचे सरपंच नितीन लाडे यांची वर्णी लागली होती.सरपंच लाडे यांनी गावात विविध विकास कामे करून गावातील पाणी प्रश्न, सि.सी.रोड,नाली बांधकाम,स्मशान भूमी रोड,पाणी अडवा पाणी जिरवा अंतर्गत बंधारे,वृक्ष लागवड,पांदण रस्ते,मजगी कामे,आरोग्य शिबीरे,स्वच्छता अभियान, खुले जिम,शाळा दुरुस्ती,वर्ग खोली बांधकाम,नवीन अंगणवाडी बांधकाम,सभामंडप बांधकाम,संरक्षक भिंत बांधकाम,सोलर लाईट,सार्वजनिक शौचालये व इतर विविध विकास कामे करून ग्रामपंचायतीस स्मार्ट ग्राम(सुंदरग्राम)स्पर्धेत तालुकास्तरीय तसेच जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक,संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान स्पर्धेत ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम’ जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक पुरस्कार मिळवून देण्यात मोलाचे कार्य केले.सरपंच लाडे यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून आज त्यांना आदर्श सरपंच पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

- Advertisement -

