Sunday, September 13, 2026
Homeभंडारापॉलिसीचे मासिक हप्ते थकित म्हणून मृत्यूपश्चात मिळणारा लाभ विमा कंपनीला नाकारता येणार...

पॉलिसीचे मासिक हप्ते थकित म्हणून मृत्यूपश्चात मिळणारा लाभ विमा कंपनीला नाकारता येणार नाही… – विमा कंपनीला ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा दणका..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

भंडारा :-एखाद्या व्यक्तीचे काही कारणास्त विमा पॉलिसीचे मासिक हप्ते थकित असल्यास मृत्यूपश्चात मिळणारा लाभ विमा कंपनीला नाकारता येणार नाही. संबंधित व्यक्तीच्या वारसांना मृतकाच्या पॉलिसीचा संपूर्ण लाभ द्यावा; असे आदेश भंडारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिले आहे.या निर्णयाने विमा कंपनीला चांगलीस चपराक बसली आहे.तक्रारकर्त्या रुपाली भुदेव रेहपाडे यांचे पती मृत भुदेव रेहपाडे हे पाटबंधारे विभागात कार्यरत होते.दरम्यान,२७ फेब्रुवारी २०२१ रोजी कोवीड १९ च्या प्रादुर्भावाने निधन झाले.मृत भुदेव रेहपाडे यांनी भारतीय जीवन विमा निगम भंडारातर्फे आधारस्तंभ नावाची पॉलिसी काढली होती व सदर पॉलिसीचे मासिक हप्ते हे त्यांच्या शासकीय कार्यालयातून मिळणाऱ्या पगारातून कपात करण्यात येत होते.दरम्यान,काही कारणास्तव मृतकाचे एप्रिल,मे व जून या तीन महिन्याचे विमा पॉलिसीचे मासिक हप्ते थकीत झाले होते.तर जुलैपासून विमा पॉलिसीचे मासिक हप्ते नियमित भरण्यात आले.भुदेव रेहपाडे यांच्या मृत्यूपश्चात त्यांची पत्नी रुपाली भुदेव रेहपाडे यांनी विमा पॉलिसीचा लाभ मिळण्याबाबत भारतीय विमा निगम कार्यालय भंडाराकडे अर्ज सादर केला असता, मृतकाच्या पॉलिसीचे तीन मासिक हप्ते थकीत असल्याचे कारण पुढे करून रूपाली भुदेव रेहपाडे यांना मृत्यूपश्चात पॉलीसीचा लाभ देण्यास नकार दिला.रुपाली भुदेव रेहपाडे यांनी याप्रकरणी भंडारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे तक्रार केली.ग्राहक मंचाने याप्रकरणी सर्व लेखी पुरावे व बयाण नोंदवून घेत किस्त थकीत असल्याने पॉलीसी लाभार्थ्यांच्या मृत्यूपश्चात त्यांच्या कुटुंबीयांना लाभ नाकारणे,हे चुकीचे असून भारतीय विमा निगम कार्यालयाने भुदेव रेहपाडे यांच्या मृत्यूपश्चात त्यांच्या कुटुंबीयांना विमा पॉलीसीचा संपूर्ण लाभ देण्याचे आदेश दिले.त्यासोबतच त्या लाभामधून मृतकाचे थकीत असलेले तीन मासिक किस्त वजा करण्याचे आदेश ग्राहक मंचाचे अध्यक्ष सतीश आ.सप्रे,गणपुत,सदस्या जयश्री बु.गोपनारायण व सदस्य पराग मो. सुभेदार यांनी दिले.तक्रारकर्त्यातर्फे ॲड.सुखदेवसिंह चौहान,ॲड.संतोषसिंह एस.चौहान, ॲड.शैलेंद्रसिह एस.चौहान व ॲड.जयदेवसिंह एस.चौहान यांनी बाजु मांडली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाळू घाटांच्या लिलाव प्रक्रियेसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे व धोरणात्मक बदल जारी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील वाळू आणि वाळू घाटांच्या लिलाव प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी तसेच अवैध उत्खननाला आळा घालण्यासाठी नवीन मार्गदर्शक...

चुडाराम बल्हारपुरे यांच्या ‘जत्रा घडली नागोबाची’ या लोकनाट्यास सातारा येथील पुरस्कार जाहीर.. -यंदाचा सहावा पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट,डाकेवाडी(जि. सातारा)या संस्थेतर्फे दरवर्षी मराठी साहित्यिकांसाठी उत्कृष्ट वाड्.मय स्पर्धा घेण्यात येते व पुरस्कारप्राप्त साहित्यिकांना स्पंदनच्या वार्षिक साहित्य संमेलनात उत्कृष्ट...

शाळेत विद्यार्थ्यांना दिली जाणारी शारीरिक शिक्षा पॉक्सो कायद्यांतर्गत लैंगिक गुन्ह्याच्या श्रेणीत येत नाही-सर्वोच्च न्यायालय -शिक्षकावरील संपूर्ण खटला रद्द..

उद्रेक न्युज वृत्त :-शाळेत शिक्षकाने दोन विद्यार्थिनींना दिलेल्या शिक्षेवरून शिक्षकाविरोधात नोंदवण्यात आलेला गुन्हेगारी खटला सर्वोच्च न्यायालयाने पूर्णपणे रद्द करून शाळेत विद्यार्थ्यांना दिली जाणारी शारीरिक...

आपसी समझोत्याने ४६१ प्रकरणे निकाली; तब्बल ४ कोटी १६ लाखांहून अधिकच्या रकमेवर तडजोड..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार गडचिरोली जिल्हा न्यायालय तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये शनिवार १२...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!