Wednesday, August 5, 2026
Homeभंडारापाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी गोसेखुर्द धरणातून वैनगंगा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग.. - यंत्रणांना...

पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी गोसेखुर्द धरणातून वैनगंगा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग.. – यंत्रणांना अलर्ट राहण्याचे निर्देश..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील गोसेखुर्द धरणातून वैनगंगा नदीतील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी ४० क्युमेक्स पाणी(४० हजार लिटर प्रति सेकंद)सोडण्यात आले असून धरणात येणाऱ्या पाण्याच्या येव्यानुसार सदरचे विसर्ग टप्प्याटप्प्याने कमी अधिक करण्यात येणार आहे.पाण्याच्या विसर्गामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत अचानक वाढ होण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याने नदीकाठावर किंवा नदीपात्रात ये-जा करणाऱ्या नागरिकांनी,मच्छिमारांनी तसेच पशुपालकांनी दक्षता घ्यावी,असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.दरम्यान, कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी नागरिकांनी नदी क्षेत्रापासून दूर राहावे,असेही आवाहन करण्यात आले आहे.यासोबतच संबंधित यंत्रणांना अलर्ट राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रत्येक विभागाने आपापल्या स्तरावर आवश्यक ती खबरदारी घ्यावी व सदरची माहिती तातडीने जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवावी,असेही प्रशासनाने नमूद केले आहे.प्रशासन परिस्थितीवर सतत लक्ष ठेवण्यात येत असून,गरज भासल्यास पाणी विसर्जनाच्या प्रमाणात बदल केला जाईल.नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये व फक्त प्रशासनाकडून प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करावे,असेही प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बापरे..!अंतिम संस्काराची तयारी सुरू असतांनाच मृतक व्यक्तीने उघडले डोळे..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्यात एक अचंभित करणारी घटना काल मंगळवारी उघडकीस आली.एका ४० वर्षीय व्यक्तीची प्रकृती अचानक खालावल्याने कुटुंबीयांनी त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल...

ऑगस्ट महिन्यापासून गॅस कनेक्शनची ई-केवायसी असणे बंधनकारक; अन्यथा कनेक्शन होणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त :-गॅस सिलिंडरचा काळाबाजार थांबवण्यासाठी आणि साठेबाजी उघड करण्यासाठी केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील गॅस कंपन्या इंडेन, एचपी आणि भारत गॅसच्या ग्राहकांसाठी स्वयंपाकाच्या...

आता बनावट किंवा खोट्या कागदपत्रांच्या आधारे जातवैधता प्रमाणपत्र तयार करणे पडणार महागात..

उद्रेक न्युज वृत्त :-बरेचदा जातवैधता प्रमाणपत्र अर्थात कॉस्ट व्यालीडिटी सर्टिफिकेट बनावट किंवा खोट्या कागदपत्रांच्या आधारे बनवून शासकीय योजनांचा लाभ मिळवणे,शासकीय नोकरी,अभियांत्रिकी प्रवेश व इतर...

महामार्गाच्या विस्तारासाठी सरकारने शेतकऱ्यांना भूमिहीन करू नये- विजय वडेट्टीवार

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचा विस्तार भंडारा,गोंदिया,गडचिरोली आणि चंद्रपूरपर्यंत करण्यासाठी सुरू असलेल्या भूसंपादनात व सुपिक जमीन घेण्यासाठी प्रशासनाकडून बळजबरी केली जात असल्याचा आरोप...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!