- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :-आई-वडील जीवाचे रान करून संसाराचा गाडा कसा हाकता येणार,अश्या विवंचनेत नेहमी असतात.त्यातच मुलांना लहाण्याचे मोठे करण्यात मोठी दमछाक करावी लागते.अशातच मुले मोठी झाली की,मुलांच्या शिक्षणाची,लग्नाची चिंता नेहमी भेडसावत असते.काहीजण कर्जबाजारी होऊन चींतेतून सावरण्याचा प्रयत्न करीत असतात.असाच काहीसा प्रकार गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ग्राम बाराभाटी येथे मंगळवारी उघडकीस आला.मुलीच्या लग्नाच्या चिंतेतून बापाने शेतातील पळसाच्या झाडाला दोरीने गळफास लावून आत्महत्या केली.मोहनलाल गोविंदा घरतकर वय ५५ वर्षे असे आत्महत्या केलेल्या मुलीच्या बापाचे नाव आहे.मोहनलाल यांची पत्नी नेहमीच आजारी राहत असून लहान मुलगी लग्नाची आहे.तिच्या लग्नासाठी पैसे कुठून आणावेत या चिंतेत होते.यातूनच सोमवारी २३ डिसेंबरला दुपारी १ वाजताच्या सुमारास मोहनलाल मुलीच्या गावी नवेगावबांध येथे जातो असे सांगून घरातून निघाले. मात्र,त्यांनी शेतातील पळसाच्या झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आले.यशवंत गोविंदा घरतकर रा.बाराभाटी यांच्या तक्रारीवरून अर्जुनी-मोरगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
- Advertisement -

