Wednesday, July 15, 2026
Homeगोंदियाशेतातील विहिरीत पडून वाघाचा मृत्यू..!

शेतातील विहिरीत पडून वाघाचा मृत्यू..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-जिल्ह्याच्या नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर परिसरात एका वाघाच्या मृत्यूची घटना उघडकीस आली आहे.विहिरीला कठडे नसल्याने वाघ थेट शेतातील विहिरीत पडून मृत पावल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा वनपरिक्षेत्रातील माल्ही बीट अंतर्गत येणाऱ्या कोडेलोहारा परिसरात आज,रविवार १२ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. विहिरीत पडून मृत पावलेला वाघ हा चार ते पाच वर्षाचा होता.
आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास कोडेलोहारा येथील शेतकरी रुपचंद इसन कावळे यांच्या शेतातील विहिरीत वाघ पडल्याची माहिती वन विभागास मिळताच नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव वन क्षेत्राचे जलद बचाव पथक आणि भंडारा वनविभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.नवेगाव नागझिराचे उपसंचालक प्रितमसिंग कोडापे,सहाय्यक वनसंरक्षक विजय धांडे,मनिषा चव्हाण तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी रविकमल भगत आणि टेंभरे यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली आणि अथक परिश्रमानंतर वाघाला विहिरीतून बाहेर काढले.प्राथमिक तपासात सदरचा वाघ हा शिकारीच्या वा पाण्याच्या शोधात भटकत असतांना तोल जाऊन विहिरीत पडला असावा,असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.अपघात की काय? याचा तपास सुरू असून वनविभागाने ‘व्हिसेरा सॅम्पल’ प्रयोगशाळेत पाठवला. वाघाच्या मृत्यूचे खरे कारण हे शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

राज्याच्या विविध भागात पाऊस करणार दमदार एंट्री..

उद्रेक न्युज वृत्त :- 'नैसर्गिक आपत्तीस मंडळ जबाबदार राहणार नाही' अश्या म्हणण्याप्रमाणे पावसाचे काही खरे नाही.कुठे मुसळधार पडतो तर कुठे पाण्याचा एक थेंबही पडत नाही.त्यातच...

आता राज्यभरातील धनादेश अनादराची प्रकरणे परस्पर सामंजस्याने निघणार निकाली..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशान्वये निगोशिएबल इन्स्ट्रुमेन्ट्स ॲक्ट,१८८१ च्या...

आजपासून संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ च्या कलम ३७ (१) व (३)अन्वये संपूर्ण गडचिरोली...

महत्त्वपूर्ण निर्णय..चंद्रपूर डाक विभागातून विभाजन होऊन आता गडचिरोली स्वतंत्र डाक विभाग..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत डाक विभागाने चंद्रपूर डाक विभागातून गडचिरोली डाक विभागाचे प्रशासकीय विभाजन करण्याची अधिकृत घोषणा केली आहे.या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!