Friday, May 1, 2026
Homeदेसाईगंजनिवडून दिलेला लोकप्रतिनिधी जनतेसाठीच असावा; अन्यथा 'एक ना धड भाराभर चिंध्या' -आमदार...

निवडून दिलेला लोकप्रतिनिधी जनतेसाठीच असावा; अन्यथा ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ -आमदार कृष्णा गजबे यांचे प्रतिपादन…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

देसाईगंज(गडचिरोली) :- भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे जिल्हा सचिव, सचिन वानखेडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून देसाईगंज येथील माता वार्डातील गजानन मंदिर सभागृहात मोफत शासकीय योजना शिबीर व पत्रकार तसेच कारसेवकांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.सदर समारंभ प्रसंगी लोकप्रतिनीधी हा जनतेचा मालक नसुन  जनसेवक आहे.त्यामुळे निवडून दिलेला लोकप्रतिनिधी जनतेसाठीच असावा; अन्यथा ‘एक ना धड भाराभर चिंध्या असे झाल्याशिवाय राहणार नाही.

त्या करीता लोकांशी संवाद साधणेही तेवढेच गरजेचे आहे.त्यामुळे सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी सार्वजनिक उपक्रम राबविणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी केले.देसाईगंज येथील माता वार्डातील गजानन मंदिर सभागृहात भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सचिव सचिन वानखेडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून देसाईगंज तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने मोफत शासकीय योजना शिबीर व पत्रकार तसेच कारसेवकांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला असता प्रमुख मार्गदर्शक म्हणून आमदार गजबे प्रसंगी बोलत होते.यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा,माजी नगराध्यक्षा शालु दंडवते,श्याम उईके,देसाईगंज भाजपा तालुकाध्यक्ष सुनील पारधी,माजी नगरसेवक राजु जेठानी,नरेश विठ्ठलानी, सचिन खरकाटे,वसंता दोनाडकर,हेमा कावळे,दादाजी नाकतोडे आदी मान्यवर उपस्थित होते.दरम्यान पुढे बोलतांना आमदार गजबे म्हणाले की,शासकीय स्तरावरुन अनेक लोकाभिमुख योजना राबविल्या जातात.मात्र काही कारणास्तव त्या लोकांपर्यंत पोहोचत नसल्याने लोकांना त्याचा फायदा होत नाही.असे होऊ नये म्हणून पक्षाच्या वतीने लोकसंवाद साधण्याकरीता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून कार्यक्रमाचे औचित्य साधून राबविण्यात येत असलेल्या योजना नागरिकांपर्यंत पोहचवीण्यात व त्याचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.कार्यक्रमाचे औचित्य साधून देसाईगंज तालुक्यातील पत्रकार तसेच कारसेवकांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी २०७ लाभार्थ्यांनी आभा कार्ड,१४० नागरिकांनी पॅन कार्ड व २१० नागरिकांनी आयुष्यमान भारत कार्ड काढून उपक्रमाचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक चैतनदास विधाते यांनी तर आभार सचिन वानखेडे यांनी मानले.सदर कार्यक्रमास शहरातील तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘आदिशा’ प्रकल्पांतर्गत महिला बचत गटातील लाभार्थ्यांना मिळणार दोन टक्के व्याजदराने १ लाख रुपये..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महिला बचत गटांना केवळ २ टक्के व्याजदराने फिरता निधी उपलब्ध करून देत गावपातळीवर आर्थिक साखळी निर्माण करणारा ‘आदिशा’ प्रकल्प जिल्ह्याच्या विकासात...

चक्क चोरट्यांनी खासदारांच्या शेतातील वीज मीटरसह मोटरपंप नेला चोरून.

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यात चोरीच्या घटनांनी जोर धरलेला असतांनाच आता थेट लोकप्रतिनिधीही यातून सुटलेले नाहीत.भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांच्या वडिलोपार्जित शेतातून अज्ञात...

तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; चंद्रपूर पोलिस अधीक्षक पदाची सूत्रे आता आयुष नोपानी यांच्याकडे..

उद्रेक न्युज वृत्त :-ऐन महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्यातील तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या(भारतीय पोलीस सेवा)बदल्या करण्यात आल्या आहेत.यात चंद्रपूरचे विद्यमान...

“आपण लोकांची कामे करण्यासाठी बसलो आहोत; अडवणूक करण्यासाठी नाही”.. -सहपालकमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण मॅपिंग करून शासनाने स्वतः त्यांच्या दारात जाऊन गरजेनुसार योजनांचा लाभ द्यावा,अशी भूमिका कृषी राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!