Monday, July 13, 2026
Homeदेसाईगंजनिवडून दिलेला लोकप्रतिनिधी जनतेसाठीच असावा; अन्यथा 'एक ना धड भाराभर चिंध्या' -आमदार...

निवडून दिलेला लोकप्रतिनिधी जनतेसाठीच असावा; अन्यथा ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ -आमदार कृष्णा गजबे यांचे प्रतिपादन…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

देसाईगंज(गडचिरोली) :- भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे जिल्हा सचिव, सचिन वानखेडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून देसाईगंज येथील माता वार्डातील गजानन मंदिर सभागृहात मोफत शासकीय योजना शिबीर व पत्रकार तसेच कारसेवकांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.सदर समारंभ प्रसंगी लोकप्रतिनीधी हा जनतेचा मालक नसुन  जनसेवक आहे.त्यामुळे निवडून दिलेला लोकप्रतिनिधी जनतेसाठीच असावा; अन्यथा ‘एक ना धड भाराभर चिंध्या असे झाल्याशिवाय राहणार नाही.

त्या करीता लोकांशी संवाद साधणेही तेवढेच गरजेचे आहे.त्यामुळे सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी सार्वजनिक उपक्रम राबविणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी केले.देसाईगंज येथील माता वार्डातील गजानन मंदिर सभागृहात भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सचिव सचिन वानखेडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून देसाईगंज तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने मोफत शासकीय योजना शिबीर व पत्रकार तसेच कारसेवकांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला असता प्रमुख मार्गदर्शक म्हणून आमदार गजबे प्रसंगी बोलत होते.यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा,माजी नगराध्यक्षा शालु दंडवते,श्याम उईके,देसाईगंज भाजपा तालुकाध्यक्ष सुनील पारधी,माजी नगरसेवक राजु जेठानी,नरेश विठ्ठलानी, सचिन खरकाटे,वसंता दोनाडकर,हेमा कावळे,दादाजी नाकतोडे आदी मान्यवर उपस्थित होते.दरम्यान पुढे बोलतांना आमदार गजबे म्हणाले की,शासकीय स्तरावरुन अनेक लोकाभिमुख योजना राबविल्या जातात.मात्र काही कारणास्तव त्या लोकांपर्यंत पोहोचत नसल्याने लोकांना त्याचा फायदा होत नाही.असे होऊ नये म्हणून पक्षाच्या वतीने लोकसंवाद साधण्याकरीता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून कार्यक्रमाचे औचित्य साधून राबविण्यात येत असलेल्या योजना नागरिकांपर्यंत पोहचवीण्यात व त्याचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.कार्यक्रमाचे औचित्य साधून देसाईगंज तालुक्यातील पत्रकार तसेच कारसेवकांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी २०७ लाभार्थ्यांनी आभा कार्ड,१४० नागरिकांनी पॅन कार्ड व २१० नागरिकांनी आयुष्यमान भारत कार्ड काढून उपक्रमाचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक चैतनदास विधाते यांनी तर आभार सचिन वानखेडे यांनी मानले.सदर कार्यक्रमास शहरातील तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

यालाच म्हणतात खरे राजकारण..! स्थानिक आमदारांची चुप्पी; तर बाहेरच्या आमदारांना चिंता..

उद्रेक न्युज वृत्त  ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-काही कालावधीपासून राज्याच्या विविध भागात अवैध रेती उत्खनन आणि रेती तस्करीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.रेतीतून मिळणारा बक्कळ पैसा अनेकांना करोडपती,तर काहींना रोडपती...

तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त; दोन आरोपींना अटक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-शांतीनगर पोलिस ठाणे हद्दीत नागपूर गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त करून दोन आरोपींच्या मुसक्या...

सिंदेवाहीत माकडांची दहशत कायम; दोन दिवसांत दोन जणांवर हल्ले,नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-सिंदेवाही शहरात माकडांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढतच चालला असून दोन दिवसांत दोन नागरिकांवर हल्ले झाल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे वनविभागाने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!