Monday, September 7, 2026
Homeनागपूरनागपूर येथे धम्मदीक्षा सोहळा; सातशेच्या वर उपासकांनी बौद्ध धम्माची घेतली दीक्षा...

नागपूर येथे धम्मदीक्षा सोहळा; सातशेच्या वर उपासकांनी बौद्ध धम्माची घेतली दीक्षा…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-दीक्षाभूमीवर काल गुरुवारपासून धम्मदीक्षा सोहळ्याला सुरुवात झाली.डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती,दीक्षाभूमीचे अध्यक्ष तथा धम्मसेना नायक भदन्त आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या उपस्थितीत सकाळी बुद्ध वंदना घेण्यात आली. यावेळी ससाई यांनी विविध राज्यातून आलेल्या उपासक-उपासिकांना धम्मदीक्षा दिली.पहिल्याच दिवशी सातशेच्या वर उपासकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली.
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी ऑक्टोबर १४ ऑक्टोबर १९५६ रोजी विजयादशमीला महास्थवीर चंद्रमणी यांच्याकडून त्रिशरण व पंचशील ग्रहण करून धम्मदीक्षा घेतली होती.त्या दिवसाची आठवण म्हणून भदन्त ससाई दर वर्षी धम्मदीक्षेचा कार्यक्रम आयोजित करतात.१० ते १२ ऑक्टोंबर दम्यान सलग तीन दिवस दीक्षेचा कार्यक्रम चालणार आहे.धम्ममंचावर भदन्त ससाई यांच्यासह भन्ते नागसेन,भन्ते प्रज्ञाबोधी,भन्ते नागवंश,भन्ते महानागा, भन्ते धम्मप्रकाश,भन्ते धम्मविजय,भन्ते नागवंश एस., भन्ते भीमा बोधी,भन्ते अश्वजित,धम्मशीला उपस्थित होत्या.सकाळपासून सुरू झालेल्या कार्यक्रमात सायंकाळपर्यंत जवळपास सातशेच्या वर उपासक उपासिकांनी धम्मदीक्षा घेतली.ससाई यांच्यासह प्रज्ञाबोधी व इतरही भन्तेनी धम्मदीक्षा दिली. उपासकांनी त्रिशण व पंचशील ग्रहण केले.तसेच त्यांना २२ प्रतिक्षा दिल्या.दीक्षाभूमीवरील धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या एक दिवसापूर्वी पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण केले जाते. आज,शुक्रवारी सकाळी ९ वाजता भदन्त सुरेई ससाई यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.त्यानंतर धम्मदीक्षेचा कार्यक्रम आज दिवसभर सुरू होता. सायंकाळी बुद्ध भीम गीतांचा संगीतमय कार्यक्रम, तसेच अंगुलीमाल व आम्रपाली हे नाट्य सादर केले जाणार आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माजी सरपंचांनाच प्रशासक म्हणून कायम ठेवण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील सुमारे १४ हजार २३४ ग्रामपंचायतींवर तत्कालीन सरपंच हे प्रशासक म्हणून नेमण्यात आले होते.अश्यातच माजी सरपंचांच्या सहा महिन्यांच्या काही प्रशासक पदाची...

नागपुरातील ऐतिहासिक ‘मारबत महोत्सव’ आजपासून सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य घटक असलेला ऐतिहासिक 'मारबत महोत्सव' आज,रविवार ६ सप्टेंबरपासून सुरू झाला.या वर्षीचा महोत्सव हा १४५...

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!