Monday, July 13, 2026
Homeचंद्रपूरनवस फेडण्यासाठी सातबहिणींच्या डोंगरावर गेलेल्या कुटुंबियांवर मधमाश्यांचा हल्ला..!

नवस फेडण्यासाठी सातबहिणींच्या डोंगरावर गेलेल्या कुटुंबियांवर मधमाश्यांचा हल्ला..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील प्रसिद्ध  सातबहिणींच्या डोंगरावर मुलीचा नवस फेडण्यासाठी गेलेल्या कुटुंबियांवर अचानकपणे मधमाश्यांनी हल्ला चढवून गंभीर जखमी केल्याची घटना उघडकीस आली आहे.यात ३ वर्षीय चिमुकली सायली चाचरकर,पुजारी विठ्ठल चाचरकर वय ५५ वर्षे,नत्थू चाचरकर वय ६२ वर्षे व कविता चाचरकर वय ५२ वर्षे अशी जखमींची नावे असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
चाचरकर कुटुंबातील काही सदस्य सातबहिणींच्या डोंगावर आपल्या मुलीचा नवस फेडण्यासाठी गेले होते. त्यांनी पूजा सुरू केली असतांनाच अचानक मधमाश्यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला.यामुळे पूजास्थळी एकच धावपळ उडाली.सर्वजण जीवाच्या आकांताने वाट मिळेल तिकडे पळत सुटले.मात्र,मधमाशांच्या हल्ल्यात चारजण गंभीर जखमी झाले.घटनेची माहिती मिळताच तळोधी पोलिस ठाण्याचे ठाणेदार व वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.बचावकार्य राबवून सर्वांना तातडीने गोविंदपूर व तळोधी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.सध्या सर्वांची प्रकृती स्थिर असून घटनेने भाविकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

यालाच म्हणतात खरे राजकारण..! स्थानिक आमदारांची चुप्पी; तर बाहेरच्या आमदारांना चिंता..

उद्रेक न्युज वृत्त  ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-काही कालावधीपासून राज्याच्या विविध भागात अवैध रेती उत्खनन आणि रेती तस्करीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.रेतीतून मिळणारा बक्कळ पैसा अनेकांना करोडपती,तर काहींना रोडपती...

तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त; दोन आरोपींना अटक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-शांतीनगर पोलिस ठाणे हद्दीत नागपूर गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त करून दोन आरोपींच्या मुसक्या...

सिंदेवाहीत माकडांची दहशत कायम; दोन दिवसांत दोन जणांवर हल्ले,नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-सिंदेवाही शहरात माकडांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढतच चालला असून दोन दिवसांत दोन नागरिकांवर हल्ले झाल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे वनविभागाने...

राज्यात ‘किलकारी’ उपक्रमात वर्धा पहिल्या,चंद्रपूर दुसऱ्या,वाशीम तिसऱ्या तर गडचिरोली चौथ्या स्थानावर..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयांतर्गत गरोदर माता,माता आणि बालकांच्या आरोग्याविषयी डिजिटल साक्षरता व जनजागृती करणाऱ्या ‘किलकारी’(Kilkari Mobile Audio Services)उपक्रमात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!