Saturday, August 8, 2026
Homeदेसाईगंजधान पीक कापणी करताना शेतकऱ्याचा अचानक मृत्यू…-देसाईगंज तालुक्याच्या अरततोंडी येथील घटना..

धान पीक कापणी करताना शेतकऱ्याचा अचानक मृत्यू…-देसाईगंज तालुक्याच्या अरततोंडी येथील घटना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

देसाईगंज(गडचिरोली) :- देसाईगंज तालुक्यातील अरततोंडी (जुनी) येथे उन्हाळी धान पीक कापणी करताना एका शेतकऱ्याचा अचानक मृत्यू झाला. त्यामुळे कुटुंबावर आघात झाला आहे.ही घटना काल, १९ मे रोजी सकाळी साडेसात वाजता घडली.

चंद्रसेन धांडे वय ५० वर्षे असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.ते मूळचे चंद्रपूरच्या ब्रम्हपुरी तालुक्यातील पिंपळगाव (भोसले) गावचे असून त्यांची शेती अरततोंडीत आहे.जेमतेम दोन एकर जमिनीत धान पीक घेऊन ते उदरनिर्वाह करीत होते.काल,१९ मे रोजी सकाळीच ते पत्नीसमवेत धान काढण्यासाठी शेतावर गेले होते. धान कापणी करत असताना अचानक त्यांची प्रकृती खालावली.ते जमिनीवर कोसळले अन् क्षणातच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान,कुटुंबियांनी त्यांना तातडीने दवाखान्यात नेले पण तोपर्यंत उशीर झाला होता.मृत्यूचे नेमके कारण कळले नसले तरी तीव्र हृदयविकाराचा झटका किंवा उष्माघाताने मृत्यू झाला असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.देसाईगंज पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला. दुपारी ४ वाजता त्यांच्यावर मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.चंद्रसेन धांडे यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले आहेत.घरातील कर्ता व्यक्ती गेल्याने पत्नी व मुलांचा आधार हरवला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शिक्षण सेवक व शिक्षक पदभरती प्रक्रियेस सुरुवात; राज्यात ३० हजार २०९ रिक्त पदांची भरती..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये 'पवित्र पोर्टल'द्वारे शिक्षण सेवक आणि शिक्षक पदभरतीची कार्यवाही सुरू करण्यात आली...

गडचिरोली जिल्ह्यात अग्निवीर भरतीसाठी तब्बल सहा ठिकाणी मार्गदर्शन मेळावे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारतीय सैन्यातील अग्निवीर भरती प्रक्रियेबाबत जिल्ह्यातील इच्छुक युवक-युवतींना सविस्तर माहिती व मार्गदर्शन मिळावे,यासाठी गडचिरोली जिल्ह्यात येत्या,सोमवार १० ते १२ ऑगस्ट २०२६...

सात हजाराची लाच भोवली; महिला ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यात भंडारा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत तब्बल सात हजाराची लाच घेतांना एका महिला ग्रामसेविकेस रंगेहाथ पकडले.रंजू...

राज्यातील ६ लाख २२ हजार शेतकऱ्यांना ५ हजार २९ कोटींच्या कर्जमुक्ती लाभाचे वितरण.. – आज गडचिरोली जिल्ह्यातील २ हजार ६७१ पात्र शेतकऱ्यांसाठी बँकांना रक्कम...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :- 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील २ हजार ६७१ पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांसाठी १५ कोटी १८ लाख ७२ हजार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!