Thursday, May 28, 2026
Homeमुंबईलोकसभा निवडणुकीचा अंतिम टप्प्यातील मतदान उद्याला...

लोकसभा निवडणुकीचा अंतिम टप्प्यातील मतदान उद्याला…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

मुंबई :- लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील प्रचाराला काल, शनिवारी पूर्णविराम मिळाला.मुंबईतील सहा जागांसह ठाणे,कल्याण,भिवंडी,पालघर, नाशिक, दिंडोरी आणि धुळे या १३ लोकसभा मतदारसंघांत उद्या सोमवार, २० मे रोजी मतदान होणार आहे.पाचव्या टप्प्यातील प्रचारासाठी महायुती आणि महाविकास आघाडीने आपली संपूर्ण ताकद पणाला लावली.

प्रचाराच्या शेवटच्या दिवशीसुद्धा दोन्ही बाजूंनी एकमेकांवर जोरदार टीकास्त्र सोडल्याने राजकीय तापमानसुद्धा वाढल्याचे चित्र आहे.प्रत्यक्ष प्रचाराचा कालावधी संपला असला,तरी आता पुढील दोन दिवस छुप्या प्रचाराला गती येणार आहे.त्यामुळे निवडणूक आयोगासह संपूर्ण निवडणूक यंत्रणा सतर्क झाली आहे.शनिवारी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीने संयुक्त पत्रकार परिषद घेत महायुतीवर विशेषतः भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे,ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,राष्ट्रवादी पवार गटाच्या शरद पवारांसह महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचा समाचार घेतला.त्यानंतर,पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उत्तर पश्चिम ९ मुंबई लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्या मतदारसंघात रोड शो केला.मुंबईत रोड शो तसेच ठाकरे गटाच्या उमेदवारांसाठी दक्षिण मध्य आणि दक्षिण नवी मुंबईत सभा घेतल्या.या सभांच्या माध्यमातून त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठवली.या प्रचाराची सांगता उद्धव ठाकरे यांनी मुंबादेवी मंदिरात दर्शनाने केली. यावेळी त्यांच्यासोबत रश्मी ठाकरे,आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जंगली डुकराची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा मुख्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर जंगली डुकराची धावत्या दुचाकीला जोरदार धडक बसल्याने दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना...

५० हजार देऊनही २५ हजारासाठी तगादा; मंडळ अधिकारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका लाचखोर मंडळ अधिकाऱ्याने  शेतजमीनीचे फेरफार करण्यासाठी तब्बल ७५ हजाराची लाच मागणी करून त्यातील ५० हजार घेऊन फेरफार करून दिले,पण उर्वरित...

अजब-गजब कारनामा..! वसतिगृहात कुलरची मागणी केली म्हणून विद्यार्थिनीला हकालपट्टीची नोटीस..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सध्या विदर्भात तीव्र उष्णतेची लाट सुरू आहे. यामुळे जीवाची लाही-लाही होत आहे.प्रचंड उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.त्यातच,पंखे व इतर हवेच्या साधनांनी...

‘आंबा महोत्सव-२०२६’; गडचिरोलीसह भंडारा, गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्यातील २१७ गावांमधून संकलित केलेल्या आंबा वाणांचे प्रदर्शन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पारंपरिक धान पिकासोबतच अधिक उत्पन्न देणाऱ्या फळपिकांकडे वळावे.आंबा हे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर पीक असून, शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आंब्याची लागवड करणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!