Saturday, August 8, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली,चंद्रपूर जिल्ह्यात पाच दिवस अवकाळी पावसाचा इशारा…

गडचिरोली,चंद्रपूर जिल्ह्यात पाच दिवस अवकाळी पावसाचा इशारा…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

मुख्य संपादक/सत्यवान रामटेके 

गडचिरोली :- जून महिना संपायला अवघे दहा दिवस बाकी असतानाही अवकाळी पाऊस विदर्भातून जायला तयार नाही.दर दिवशीच हवामान खाते येलो ऑरेंज अलर्ट घोषित करून नागरिकांना अलर्ट करीत आहे.हवामान खात्याने आज रविवारी (दिनांक -१९) पुन्हा पाच दिवसाचा दिनांक- १९ मे ते २३ मे पर्यंत यलो अलर्ट घोषित केला आहे.यामध्ये गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश आहे.

विदर्भातील उर्वरित जिल्ह्यात नागपूर,वर्धा भंडारा आणि गोंदिया या ठिकाणी तीन दिवसाचा यलो अलर्ट चा इशारा देण्यात आला आहे.यंदाचा संपूर्ण उन्हाळा अवकाळी पावसात जात आहे.वादळी वारा गारपीटीसह अवकाळीचे आगमन होऊन शेतकरी त्रस्त झाला आहे.दर दिवशी हवामान खात्याचा इशारा येत असल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे.यावर्षीचा संपूर्ण उन्हाळाच अवकाळी पावसाच्या तडाख्यात सापडलेला आहे.त्यामुळे कधी पावसाळा तर कधी उन्हाळ्याचा अनुभव नागरिकांना घेत आहे.परंतु अवकाळी पावसात शेतकऱ्यांचे रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

सध्या विदर्भातील चंद्रपूर भंडारा वर्धा गोंदिया नागपूर या जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी उन्हाळी धान पिकांची लागवड करण्यात आली आहे.काही ठिकाणी फळबागा,भाजीपालाचे उत्पन्न घेतली जात आहे; परंतु अवकाळी पावसात वादळीवाऱ्यासह पाऊस येत असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.दिवसागणिक हवामान खात्याचा अंदाज बदलत आहे.आज १९ मे ला हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आज रविवारपासून चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात २३ मे पर्यंत पाच दिवसाचा तर नागपूर, वर्धा,भंडारा गोंदिया येथे पुढचे दोन दिवस आज आणि उद्या वगळता २३ मे पर्यंत तीन दिवसाचा यलो अलर्ट चा इशारा दिला आहे.

आठदिवसांवर येवून ठेपलेल्या जून महिन्यामध्ये हवामान खात्याने दिलेल्या इशारा नुसार पावसाला पडायला सुरूवात होईल.यावर्षीचा पावसाळा गेल्यापासून मार्च,एप्रिल,मे तिन्ही महिन्यात अवकाळी पडत आहे.दिवसाआड अवकाळी पाऊस कुठे ना कुठे कोसळत असल्यामुळे त्याचा परिणाम शेतपिकावर झाला आहे.सध्या पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यात उन्हाळी धनाची लागवड करण्यात आलेली आहे.

काही ठिकाणी हार्वेस्टर व्दारे धानाची मळणी झालेली आहे.परंतु काही ठिकाणी अवकाळी पावसामुळे धान कापणी मध्ये अडचण अडथळे येत आहे.अवकाळी पाऊस वादळी वाऱ्यासह येत असल्यामुळे धान पडलेले आहेत.त्यामुळे धानाचे प्रचंड नुकसान होत आहे.दरदिवशी हवामान खाते अवकाळीचा इशारा देत आहे.त्यामुळे अवकाळी पाऊस पडला तर शेतकऱ्यांना धान कापणी करताना मोठी नुकसान सहन करावी लागू शकते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शिक्षण सेवक व शिक्षक पदभरती प्रक्रियेस सुरुवात; राज्यात ३० हजार २०९ रिक्त पदांची भरती..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये 'पवित्र पोर्टल'द्वारे शिक्षण सेवक आणि शिक्षक पदभरतीची कार्यवाही सुरू करण्यात आली...

गडचिरोली जिल्ह्यात अग्निवीर भरतीसाठी तब्बल सहा ठिकाणी मार्गदर्शन मेळावे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारतीय सैन्यातील अग्निवीर भरती प्रक्रियेबाबत जिल्ह्यातील इच्छुक युवक-युवतींना सविस्तर माहिती व मार्गदर्शन मिळावे,यासाठी गडचिरोली जिल्ह्यात येत्या,सोमवार १० ते १२ ऑगस्ट २०२६...

सात हजाराची लाच भोवली; महिला ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यात भंडारा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत तब्बल सात हजाराची लाच घेतांना एका महिला ग्रामसेविकेस रंगेहाथ पकडले.रंजू...

राज्यातील ६ लाख २२ हजार शेतकऱ्यांना ५ हजार २९ कोटींच्या कर्जमुक्ती लाभाचे वितरण.. – आज गडचिरोली जिल्ह्यातील २ हजार ६७१ पात्र शेतकऱ्यांसाठी बँकांना रक्कम...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :- 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील २ हजार ६७१ पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांसाठी १५ कोटी १८ लाख ७२ हजार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!