Monday, May 25, 2026
Homeचंद्रपूरदोन पोलिसांना आर्थिक देवाण- घेवाण करणे पडले महागात- दोन्ही कर्मचाऱ्यांना केले निलंबित;...

दोन पोलिसांना आर्थिक देवाण- घेवाण करणे पडले महागात- दोन्ही कर्मचाऱ्यांना केले निलंबित; चंद्रपूर जिल्ह्यातील घटना

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

 चंद्रपूर (तळोधी बा.) :-तळोधी बा.पोलिस स्टेशन अंतर्गत कार्यरत असलेल्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांना आर्थिक देवाण घेवाणी वरून चंद्रपूरचे पोलिस अधीक्षक रविंद्रसिंग परदेशी यांनी पोलिस स्टेशनचे सहाय्यक फौजदार सुरेश पानसे व पोलिस शिपाई मनीष गेडाम यांना निलंबित केले आहे. 

नवानगर वॉर्डातील मायाबाई बोरकर यांच्या गोठ्यातून दोन बकरे व दोन शेळ्या चोरी गेल्याची तक्रार देण्यात आली.संशयित म्हणून त्याच वॉर्डात राहणार अश्विन मेश्राम या युवकाचे नाव समोर आले.चौकशी करिता मेश्राम यांना पोलिस स्टेशनमध्ये आणण्यात आले व त्यांना मारहाण करून त्यांच्या कडून १५००० रुपये पानसे व गेडाम या कर्मचाऱ्यांनी घेतले.व त्यापैकी पाच हजार रुपये मायाबाईला दिले.मायाबाईने ते पैसे दुसऱ्या दिवशी परत केले.एकंदरीत हे सर्व प्रकरण पैसे घेऊन दडपण्याचा प्रयत्न दोन्ही कर्मचारी करीत होते. या प्रकरणाची माहिती सामाजिक कार्यकर्ते अजीत सुकारे यांना मिळताच त्यांनी विशेष पोलिस महानिरीक्षक नागपूर,पोलिस अधीक्षक चंद्रपूर, विभागीय पोलीस अधिकारी ब्रह्मपुरी यांना या प्रकरणाबाबत पत्रव्यवहार केला.तसेच विनाकारण मारहाण करून व जबरदस्तीने पैसे घेऊन मानसिक त्रास दिल्याबद्दल अश्विन मेश्राम यांनीसुद्धा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दोन कर्मचाऱ्यांच्या विरोधात तक्रार दिली.तसेच मायाबाई बोरकर यांनीसुद्धा मला न्याय मिळावा; यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे तक्रार केली.या तक्रारीच्या आधारे दोनही कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली तसेच सर्वांचे बयान घेण्यात आले व सरतेशेवटी प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता पोलिस अधीक्षक चंद्रपूर यांनी तात्काळ दोनही कर्मचाऱ्यांना निलंबित केले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नागरिकांनो जीवाची काळजी घ्या; आजपासून नवतपाला सुरुवात.. – सर्वाधिक तापमानाचे नऊ दिवस..

उद्रेक न्युज वृत्त :-काही दिवसांपासून सूर्यदेवता विदर्भातील जीवसृष्टीवर कोपला की काय?अशी स्थिती निर्माण झाली आहे.सूर्य मोठ्या प्रमाणावर आग ओकू लागल्याने विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये उष्ण...

नागरिकांनी लोकशाही दिनात तक्रारी व निवेदने सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन  येत्या,सोमवार १ जून २०२६ रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथील सभागृहात करण्यात आले आहे.जिल्ह्यातील नागरिकांनी...

देशात जनगणनेची प्रक्रिया सुरू झाली; पण ओबीसी समाजासाठी स्वतंत्र रकानाच नाही.. देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर धडकणार ‘भव्य मोर्चा’..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):- "आमची संख्या,आमचा हक्क,आमचा सन्मान!" आणि "जनगणनेत स्वतंत्र कॉलम,आमचा हक्क!" अशी गगनभेदी गर्जना करत देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात...

रोजगार हमी योजनेच्या कायद्याची जागा घेणाऱ्या ‘व्हीबी-जी राम जी’ योजनेत १२५ दिवस काम देण्याची हमी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच कालावधीपासून सुरू असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-२००५ कायद्याची जागा आता 'विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजिविका...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!