Monday, May 25, 2026
Homeआसामपोलीसांनी दरोडेखोर समजून केले एनकाउंटर; डीएनए विश्लेषण केल्याने निघाला भलताच

पोलीसांनी दरोडेखोर समजून केले एनकाउंटर; डीएनए विश्लेषण केल्याने निघाला भलताच

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गुवाहाटी :- आसाममधील उदलगुरी जिल्ह्यात पोलिसांनी चुकीच्या ओळखीच्या आधारे एका व्यक्तीला दरोडेखोर समजून त्याचे एनकाउंटर केले.गुन्हे अन्वेषण विभागाच्या तपासात रविवारी याबाबत पुष्टी झाली.चकमकीत मारला गेलेला व्यक्ती दरोडेखोर केनाराम बोरो उर्फ केनाराम बसुमातारी हा नसून त्याचे नाव डिंबेश्वर चहा असल्याचे तपासात समोर आले आहे.तो एक शेतकरी असल्याचा दावा त्याच्या कुटुंबियांनी केला आहे.परंतु पोलिसांचा दावा आहे की,तो सराईत गुन्हेगार होता.रौता भागातील धनसिरीखुटी गावात २४ फेब्रुवारीला झालेल्या चकमकीत दोन पोलिस जखमी झाले. बोरोच्या आईने हा मृतदेह आपल्या मुलाचा असल्याचे ओळखल्यानंतर मृतदेह तिच्या ताब्यात देण्यात आला.

यानंतर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.त्यानंतर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी पोलिस महासंचालकांना सीआयडी चौकशीचे आदेश देण्याचे निर्देश दिले.घटनेची २ मार्चपासून चौकशी सुरू करण्यात आली.पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, सदर मृतदेह बाहेर काढून त्याचे डीएनए विश्लेषण करण्यात आले.यात हा मृतदेह बोरोचा नसून मुचाहारीचा असल्याचे समोर आले.तपास अहवाल लवकरच सरकारला सादर करण्यात येणार असून मृतदेह मुचाहरी यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.दुसरीकडे, पोलिसांनी आपल्या मुलाची हत्या दरोडेखोर असल्याच्या संशयावरून केल्याने आपल्याला न्याय मिळावा, अशी मागणी मुचाहरीच्या कुटुंबीयांनी केली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नागरिकांनो जीवाची काळजी घ्या; आजपासून नवतपाला सुरुवात.. – सर्वाधिक तापमानाचे नऊ दिवस..

उद्रेक न्युज वृत्त :-काही दिवसांपासून सूर्यदेवता विदर्भातील जीवसृष्टीवर कोपला की काय?अशी स्थिती निर्माण झाली आहे.सूर्य मोठ्या प्रमाणावर आग ओकू लागल्याने विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये उष्ण...

नागरिकांनी लोकशाही दिनात तक्रारी व निवेदने सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन  येत्या,सोमवार १ जून २०२६ रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथील सभागृहात करण्यात आले आहे.जिल्ह्यातील नागरिकांनी...

देशात जनगणनेची प्रक्रिया सुरू झाली; पण ओबीसी समाजासाठी स्वतंत्र रकानाच नाही.. देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर धडकणार ‘भव्य मोर्चा’..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):- "आमची संख्या,आमचा हक्क,आमचा सन्मान!" आणि "जनगणनेत स्वतंत्र कॉलम,आमचा हक्क!" अशी गगनभेदी गर्जना करत देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात...

रोजगार हमी योजनेच्या कायद्याची जागा घेणाऱ्या ‘व्हीबी-जी राम जी’ योजनेत १२५ दिवस काम देण्याची हमी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच कालावधीपासून सुरू असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-२००५ कायद्याची जागा आता 'विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजिविका...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!