Thursday, April 30, 2026
Homeनवी दिल्लीदिल्लीत भूकंपाचे हादरे; नागरिक घराबाहेर निघाले..

दिल्लीत भूकंपाचे हादरे; नागरिक घराबाहेर निघाले..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नवी दिल्ली :-दिल्लीत आज,सोमवार १७ फेब्रुवारीला सकाळी ५ वाजून ३६ मिनिटांनी भूकंपाचे जोरदार हादरे जाणवल्याने नागरिक भयभीत होऊन घराबाहेर पडले.भूकंपाची तीव्रता ४.० रिश्टर स्केलवर असल्याचे राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने म्हटले आहे. याचे केंद्र दिल्लीच्या जवळ जमिनीपासून ५ किमी खोल होते.यामुळे याचे धक्के अधिक जाणवले.काही सेकंदापर्यंत जमीन हलत राहिल्याने इमारतींच्या आतमध्ये जोरदार कंपन जाणवले असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.त्यातच दिल्लीसह जवळपासच्या परिसरातही भूकंपाचे धक्के जाणवले.
पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियाच्या एक्सवर पोस्ट करत लोकांना सावधानता बाळगण्याचे आवाहन केले.दिल्ली आणि जवळच्या परिसरात भूकंपाचे झटके जाणवल्याने सर्वांना शांत राहण्याचे तसेच योग्य ती सुरक्षा बाळगण्याचे आवाहन केले.अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत,असे त्यांनी म्हटले.
अधिकाऱ्यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार भूकंपाचा केंग्र धौला कुआंमध्ये दुर्गाबाई कॉलेज ऑफ स्पेशल एज्युकेशनजवळ होता.जिथे भूकंपाचा केंद्रबिंदू होता तेथे एक नाला आहे.या परिसरात दर दोन ते तीन वर्षात एखादा लहान आणि कमी तीव्रतेच्या भूकंपाचे झटके बसत असतात. २०१५ मध्ये येथे ३.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला होता.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर कुरखेडा नगरपंचायत सफाई कामगारांच्या बेमुदत संपावर तोडगा; संप मागे..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा नगरपंचायत अंतर्गत कार्यरत सफाई कामगारांंनी थकीत वेतनाकरीता मागील २३ एप्रीलपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले होते.त्यामुळे शहरातील स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण...

कायदा हा लवचिक आणि बदलत्या काळाशी सुसंगत असावा- सर्वोच्च न्यायालय – गर्भपाताची परवानगी दिली नाही; तर पीडितेच्या मनावर आयुष्यभर न पुसली जाणारी जखम आणि...

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच २४ एप्रिल २०२६ रोजी न्यायमूर्ती बी.व्ही.नागरत्ना आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने एका १५ वर्षीय बलात्कार पिडीत तरुणीला ३० आठवड्यांचा...

बच्चू कडूंनी धनुष्यबाण घेतला हाती; शेतकरी,मजूर,दिव्यांगांसाठी निर्णय..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दिव्यांग,शेतकरी आणि गोरगरिबांसाठी लढणारा 'रॉबिनहूड' नेता माजी मंत्री तथा प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री...

शहरी भागात क्युआर कोड असलेली विवाह प्रमाणपत्रे द्या.. – देसाईगंज भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत सध्या स्थितीत अनेक शासकीय कागदपत्रे ऑनलाइन आणि सुरक्षित केली जात आहेत.यात विवाह नोंदणी प्रमाणपत्राचाही समावेश आहे.विवाह नोंदणी प्रमाणपत्राला विशेष...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!