Saturday, May 9, 2026
Homeचंद्रपूरदहावीत प्रथम आलेल्या विद्यार्थिनीचा सत्कार करत असतांनाच कसेतरी वाटू लागले; शिक्षकाच्या मृत्यूने...

दहावीत प्रथम आलेल्या विद्यार्थिनीचा सत्कार करत असतांनाच कसेतरी वाटू लागले; शिक्षकाच्या मृत्यूने हळहळ..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-काळाचा घाला किती निष्ठुर म्हणावा.ज्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक धडे दिले,अश्यांनी गुणवत्ता  सिद्ध केल्याने त्यांचा सत्कार करत असतांनाच कसेतरी वाटू लागले आणि काही क्षणातच आनंदी वातावरणावर दुःखाचे सावट पसरले.काल शुक्रवारी दहावीचा निकाल लागला.बऱ्याच ठिकाणी शाळेतून प्रथम,द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांचा शाळेतील शिक्षकवृंदांच्या वतीने सत्कार तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जातात.अश्याच प्रकारे चंद्रपूर जिल्ह्याच्या बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील चिंतामणी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक प्रशांत दोंतुलवार, विनायक काळे व इतर शिक्षकवृंद शाळेतून दहावीच्या परीक्षेत प्रथम आलेली लावण्या कैलास इंगोले हिचा सत्कार करण्यासाठी रात्री ७ वाजेच्या सुमारास गेले.सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देत असतांनाच उपस्थित शिक्षक विनायक काळे यांना कसेतरी वाटू लागले.दरम्यान,भोवळ येऊन खाली कोसळणार तेवढ्यातच सहकारी शिक्षकांनी त्यांना सावरले आणि तात्काळ विसापूर येथील रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारार्थ चंद्रपूर येथे हलवत असतांना वाटेतच मृत्यू झाला.विनायक महादेव काळे वय ६० वर्षे,रा. तुकडोजी चौक,विसापूर,ता.बल्लारपूर, जि.चंद्रपूर असे मृत पावलेल्या शिक्षकाचे नाव असून ते काही दिवसांपूर्वीच चिंतामणी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातून सेवानिवृत्त झाले होते व सध्या मानधन तत्त्वावर सेवा बजावत होते.अचानक घडलेल्या प्रसंगाने काळे कुटूंबीयावर मोठा आघात होऊन परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुली असा आप्त परिवार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

खरीप हंगामासाठी कृषी विभागाची विशेष मोहीम.. – धान,कापूस व सोयाबीन पिकांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जागतिक हवामान बदल आणि संभाव्य ‘एल निनो’च्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगाम- २०२६ सुरळीत व यशस्वी पार पाडण्यासाठी कृषी विभागाने जिल्ह्यात विशेष...

अन् धावत्या बसने क्षणांतच घेतला पेट; जीवितहानी टळली..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-तब्बल ४० पेक्षा अधिकचे प्रवासी घेऊन गडचिरोलीवरून चंद्रपूरकडे निघालेल्या एका इलेक्ट्रिक बसला अचानकपणे भीषण आग लागल्याची घटना आज,शुक्रवार ८ मे रोजी...

येत्या सोमवारपासून अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया.. – शैक्षणिक वर्ष २०२६-२७ चे वेळापत्रक जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग-१ आणि भाग-२ भरण्याची सुविधा येत्या,सोमवार ११ मे...

नक्षलग्रस्त भागातील सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने सीआरपीएफ कॅम्पसाठी २ हेक्टर जमीन.. – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागातील सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली येथील...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!