- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-मागील काही दिवसांपासून बिबट्याने ग्रामस्थांच्या बोकड,शेळ्या,गायी,कोंबड्या व इतर पाळीव प्राण्यांवर रात्रीच्या सुमारास हल्ला चढवून अक्षरशः धुमाकूळ घातल्याने देसाईगंज तालुक्याच्या डोंगरमेंढा येथील ग्रामस्थ बिबट्याच्या दहशतीत आहेत.
देसाईगंज तालुका मुख्यालयापासून बारा किलोमिटर अंतरावर असलेल्या डोंगरमेंढा येथे गेल्या दहा दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. गावकऱ्यांच्या सांगण्यानुसार,बिबट्या हा रात्रीच्या सुमारास गावात येऊन गोठ्यात बांधलेल्या शेळ्या, बोकड तथा गायींवर हल्ला चढवून ठार करीत आहे.नुकतेच दोन दिवसांपूर्वी गावातील नेताजी कोहळे आणि विलास मेश्राम यांच्या गोठ्यातील दोन बोकळांना बिबट्याने ठार केले आहे.पाळीव प्राण्यांसह गावातील कुत्रे,कोंबड्या उचलून नेत फस्त करीत असल्याने गावकरी त्रस्त झाले आहेत.बिबट्याच्या दहशतीमुळे गावकरी रात्रीच्या सुमारास घराबाहेर निघण्यास घाबरत आहेत.एकूणच बिबट्याच्या दहशतीत डोंगरमेंढा गावातील नागरिक रात्र पिंजून काढीत आहेत.त्यामुळे वन विभागाने सदर बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा; अशी मागणी डोंगरमेंढा ग्रामवासीयांतर्फे करण्यात येत आहे.
- Advertisement -

