Saturday, May 2, 2026
Homeदेसाईगंजडोंगरमेंढा ग्रामस्थ बिबट्याच्या दहशतीत; बिबट्याने दोन बोकड केले ठार..

डोंगरमेंढा ग्रामस्थ बिबट्याच्या दहशतीत; बिबट्याने दोन बोकड केले ठार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-मागील काही दिवसांपासून बिबट्याने ग्रामस्थांच्या बोकड,शेळ्या,गायी,कोंबड्या व इतर पाळीव प्राण्यांवर रात्रीच्या सुमारास हल्ला चढवून अक्षरशः धुमाकूळ घातल्याने देसाईगंज तालुक्याच्या डोंगरमेंढा येथील ग्रामस्थ बिबट्याच्या दहशतीत आहेत.
देसाईगंज तालुका मुख्यालयापासून बारा किलोमिटर अंतरावर असलेल्या डोंगरमेंढा येथे गेल्या दहा दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. गावकऱ्यांच्या सांगण्यानुसार,बिबट्या हा रात्रीच्या सुमारास गावात येऊन गोठ्यात बांधलेल्या शेळ्या, बोकड तथा गायींवर हल्ला चढवून ठार करीत आहे.नुकतेच दोन दिवसांपूर्वी गावातील नेताजी कोहळे आणि विलास मेश्राम यांच्या गोठ्यातील दोन बोकळांना बिबट्याने ठार केले आहे.पाळीव प्राण्यांसह गावातील कुत्रे,कोंबड्या उचलून नेत फस्त करीत असल्याने गावकरी त्रस्त झाले आहेत.बिबट्याच्या दहशतीमुळे गावकरी रात्रीच्या सुमारास घराबाहेर निघण्यास घाबरत आहेत.एकूणच बिबट्याच्या दहशतीत डोंगरमेंढा गावातील नागरिक रात्र पिंजून काढीत आहेत.त्यामुळे वन विभागाने सदर बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा; अशी मागणी डोंगरमेंढा ग्रामवासीयांतर्फे करण्यात येत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

लाडक्या बहिणींना मोठा झटका; लाखो महिला अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील अनेक कुटुंबांसाठी आधार देणारी व महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणारी महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकारने जुलै-२०२४ पासून सुरू केलेली 'मुख्यमंत्री-माझी लाडकी...

पोलीस भरतीत पात्र ठरलेले युवक-युवतीचा कुरखेडा मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने सत्कार..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीत कुरखेडा शहराच्या मुस्लिम समाजातील एक युवक व एक युवती पात्र ठरले आहे.प्रथमच शहरातील मुस्लिम समाजाची युवक-युवती पोलीस दलात दाखल...

बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; यंदाही मुलींनीच मारली बाजी..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या फेब्रुवारी- मार्च-२०२६ बारावी परीक्षेचा निकाल आज,शनिवार २ मे जाहीर करण्यात...

येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या नावात आईचे नाव अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-आईच्या योगदानाला विशेष सन्मान देण्यासाठी,लिंग समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सामाजिक समतोल राखण्यासाठी आता महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या ओळखीच्या पद्धतीत महत्त्वपूर्ण बदल...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!