- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-जिल्ह्यात भीषण अपघाताची घटना उघडकीस आली आहे.हायवा ट्रक आणि प्रवाशी रिक्षा यांच्यात समोरासमोर धडक बसल्याने रिक्षाचा चक्काचूर होऊन तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन प्रवाशांनी वाटेतच प्राण सोडला.तर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना आज,गुरुवार २८ ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजेच्या दरम्यान राजुरा तालुक्यातील गडचांदूर रस्त्यावरील कापणगावाजवळ घडली.भीषण अपघातात रिक्षाचालक प्रकाश मेश्राम वय ४९ वर्षे,रवींद्र हरी बोबडे,वय ४८ वर्षे,तनु सुभाष पिंपळकर वय १८ वर्षे व ताराबाई नानाजी पापुलवार वय ६० वर्षे हे सर्व चारहीजण राजुरा तालुक्याच्या पाचगाव येथील रहिवासी असून शंकर करू पिपरे,वय ५० वर्षे, रा.कोची व वर्षा बंडू मांडले वय ४१ वर्षे,रा.खमोना असे मृत पावलेल्या सहा जणांची नावे आहेत.तर निर्मला रावजी झाडे वय ५० वर्षे रा.पाचगाव व भोजराज महादेव कोडापे वय ४० वर्षे रा.भुरकुंडा अशी गंभीर जखमींची नावे असून त्यांच्यावर चंद्रपूर तसेच राजुरा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आज गुरुवारी दुपारच्या सुमारास राजुराहून खामोनी-पाचगाव येथे हायवा ट्रक जात होता,तर गडचांदूर येथून राजुराच्या दिशेने रिक्षाचालक व सात प्रवाशी रिक्षाने जात होते.अश्यातच रिक्षा कापणगावाजवळ सर्विस रोड वरून हायवे वर जाताच विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने रिक्षाला जोरदार धडक दिली.धडक इतकी जोरदार होती की,तीन प्रवाशी घटनास्थळीच ठार झाले.तर तीन प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्याकरीता नेत असतांना वाटेतच मृत्यू झाला. घटना घडताच ट्रक चालक ट्रक सोडून घटनास्थळावरून पसार झाला.राजुरा पोलिसांनी घटनास्थळ गाठून ट्रक ताब्यात घेतला आहे.घटनेचा पुढील तपास राजुरा पोलीस प्रशासन करीत आहे.
- Advertisement -

