Friday, August 7, 2026
Homeनवी दिल्लीजुनी पेंशन योजनेबाबत सरकारचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट…

जुनी पेंशन योजनेबाबत सरकारचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नवी दिल्ली :-संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आज सोमवारपासून सुरुवात झाली आहे.या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला.या अहवालादरम्यान जुनी पेन्शन योजनेविषयी महत्वाची माहिती समोर आली आहे.

मोदी सरकारने जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात सरकारचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट केले आहे.केंद्र सरकारने लेखी उत्तरात जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात माहिती देण्यात आली आहे.याच जुन्या पेंशन योजनेबाबत काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी केंद्र सरकारला प्रश्न विचारला होता.

जुनी पेन्शन योजना सुरू करण्यासाठी सरकारची काही योजना आहे का? असा प्रश्न काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडून करण्यात आला.या प्रश्नाला उत्तर देताना जुन्या पेंशन योजनेबाबत सरकारचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट केले आहे.दरम्यान, गेल्या अनेक वर्षापासून सरकारी कर्मचारी जुन्या पेन्शन योजनेबाबत आक्रमक आहेत.सरकारच्या या उत्तराने त्यांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे.

सरकारने जुन्या पेन्शन योजनेबाबत भूमिका स्पष्ट केल्यानंतर सराकारी कर्मचारी काय भूमिका घेतात, हे पाहावे लागणार आहे.तसेच या योजनेबाबतच्या सरकारच्या भूमिकेनंतर विरोधक काय भूमिका याकडेही सगळ्यांचे लक्ष असणार आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शिक्षण सेवक व शिक्षक पदभरती प्रक्रियेस सुरुवात; राज्यात ३० हजार २०९ रिक्त पदांची भरती..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये 'पवित्र पोर्टल'द्वारे शिक्षण सेवक आणि शिक्षक पदभरतीची कार्यवाही सुरू करण्यात आली...

गडचिरोली जिल्ह्यात अग्निवीर भरतीसाठी तब्बल सहा ठिकाणी मार्गदर्शन मेळावे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारतीय सैन्यातील अग्निवीर भरती प्रक्रियेबाबत जिल्ह्यातील इच्छुक युवक-युवतींना सविस्तर माहिती व मार्गदर्शन मिळावे,यासाठी गडचिरोली जिल्ह्यात येत्या,सोमवार १० ते १२ ऑगस्ट २०२६...

सात हजाराची लाच भोवली; महिला ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यात भंडारा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत तब्बल सात हजाराची लाच घेतांना एका महिला ग्रामसेविकेस रंगेहाथ पकडले.रंजू...

राज्यातील ६ लाख २२ हजार शेतकऱ्यांना ५ हजार २९ कोटींच्या कर्जमुक्ती लाभाचे वितरण.. – आज गडचिरोली जिल्ह्यातील २ हजार ६७१ पात्र शेतकऱ्यांसाठी बँकांना रक्कम...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :- 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील २ हजार ६७१ पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांसाठी १५ कोटी १८ लाख ७२ हजार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!