Monday, September 7, 2026
Homeदेसाईगंजगोंदिया-वडसा-चंद्रपूर पॅसेंजर रेल्वेगाडी पूर्ववत सुरू... - खासदार नामदेव किरसान यांच्या प्रयत्नांचे फलित.....

गोंदिया-वडसा-चंद्रपूर पॅसेंजर रेल्वेगाडी पूर्ववत सुरू… – खासदार नामदेव किरसान यांच्या प्रयत्नांचे फलित.. – उद्याला विजय वडेट्टीवार सह मान्यवर दाखविणार हिरवी झेंडी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-कोरोना महामारीच्या कालावधीपासून ते कित्तेक महिने लोटूनही गोंदिया-वडसा-चंद्रपूर पॅसेंजर रेल्वे गाड्यांची चाके रुळावर थांबलेली होती.अशातच गडचिरोली-चिमूर लोकसभा निर्वाचन क्षेत्राचे खासदार नामदेव किरसान निवडून येताच; त्यांनी संसदेच्या पहिल्याच अधिवेशनात डेमू ट्रेन क्र.०८८०८,०८८०५ आणि ०८८०६ या पॅसेंजर रेल्वे गाड्या संदर्भात रोखठोक इंग्रजीत संभाषण ठोकत सरकारला जाब विचारून सर्वसामान्य नागरिक,व्यापारी वर्ग,विद्यार्थी तसेच इतरांसाठी बंद असलेल्या पॅसेंजर गाड्या पूर्ववत सुरू करण्यात याव्यात; अशी मागणी केली होती.त्यानुसार आज एक पॅसेंजर रेल्वेगाडी तर उद्याला दोन पॅसेंजर रेल्वेगाड्या रुळावर पूर्ववत धावणार असल्याने खासदार नामदेव किरसान यांच्या प्रयत्नांचे फलित झाले आहे.त्यासाठी उद्या ८ सप्टेंबरला सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास  रेल्वे गाड्यांच्या स्वागतासाठी राज्याचे विधानसभा विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार,गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.नामदेवराव किरसान, गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे उपस्थित राहून रेल्वे गाड्यांना हिरवी झेंडी दाखविणार आहेत.त्यासाठी तालुक्यातील सर्व इंडिया- महाविकास आघाडीतील घटक पक्षातील सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सकाळच्या सुमारास  देसाईगंज रेल्वे स्थानकावर उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माजी सरपंचांनाच प्रशासक म्हणून कायम ठेवण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील सुमारे १४ हजार २३४ ग्रामपंचायतींवर तत्कालीन सरपंच हे प्रशासक म्हणून नेमण्यात आले होते.अश्यातच माजी सरपंचांच्या सहा महिन्यांच्या काही प्रशासक पदाची...

नागपुरातील ऐतिहासिक ‘मारबत महोत्सव’ आजपासून सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य घटक असलेला ऐतिहासिक 'मारबत महोत्सव' आज,रविवार ६ सप्टेंबरपासून सुरू झाला.या वर्षीचा महोत्सव हा १४५...

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!